शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कें द्र सरकारकडे नुकसानीची योग्य मांडणी करावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 08:02 IST

शरद पवार : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या हानीची के ली पाहणी

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोकणवासीयांनो, चिंता करु नका. आपण या संकटातून बाहेर पडू, असाही विश्वास देत आवश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानेरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा दिला आहे. येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायीक आणि सर्वसामान्य नागरिकांची शरद पवार यांनी भेट घेतली. मंगळवारी त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथील नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूंच्या बागांची पवारांनी पाहणी केली.थेट स्थानिकांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या घराची कौले, पत्रे उडाले, डोळ्यासमोर घरे जमिनदोस्त झाली. पिण्याचे पाणी नाही, गावात वीज नाही, शेती-बागायती आडवी झाली आहे खायला काहीच नाही अशी भयानक परिस्थिती नागरिकांनी पवार यांना कथन केली. त्यानंतर पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले होते. वादळामुळे ते धान्य भिजून गेले. त्या सर्वांसाठी नव्याने धान्य देता येऊ शकेल, नुकसानग्रस्त शेतकºयांना रोजगार हमी योजनेतील कामे देण्यात येतील. नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत करण्यात येईल. उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलचे वितरण करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.फलोत्पादन योजनेतील बागा उद्ध्वस्तशरद पवार हे मुख्यमंत्री असताना श्रीवर्धन तालुक्यात फलोत्पादन योजनेअंतर्गत फळांच्या अनेक बागा विकसित करण्यात आल्या होत्या. त्या सर्वच बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्याची कैफीयत पवार यांच्या समोर मांडण्यात आली. आमच्यासमोर फार मोठे संकट उभे राहीले आहे, असेही बागायतदारांनी पवार यांना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcycloneचक्रीवादळRaigadरायगड