शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2015 22:56 IST

रायगड जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळत आहे, अशी प्रशंसा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे

अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळत आहे, अशी प्रशंसा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ६८ वा वर्धापनदिन पोलीस परेड मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती चित्रा पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती भाई पाशिलकर, समाज कल्याण सभापती गीता जाधव, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले आदी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अल्प मुदतीच्या कर्जाचे रूपांतर मध्यम मुदत कर्जामध्ये केले आहे. जे शेतकरी कर्जाचा वार्षिक हफ्ता बँकेत विहित मुदतीत भरतील त्यांच्या कर्जावरील व्याज २०१५-१६ मध्ये माफ करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांसाठी ६ टक्के दराने व्याज भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी या योजनेतील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, असे मेहता यांनी सांगितले.रायगड महसूल प्रशासनाने या वर्षी ५१ शिबिरांचे आयोजन करून १३ हजार ५९३ दाखल्यांचे वापट केले. दळी जमिनींबाबत जिल्हास्तरीय समितीने ६६३ दावे मंजूर करून त्यांना टायटल प्रमाणपत्र दिले आहे. ज्यायोगे २४१.८१ हेक्टर वनक्षेत्रावर आदिवासींना हक्क देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३४६ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी ६७१.१८ लाख खर्च करण्यात आले आहेत. सरकारने नव्याने एक लाख विहिरी व ५० हजार शेततळ्याचा कार्यक्र म घेण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानदेखील यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय असल्याने महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात १६ संरक्षण अधिकारी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरदिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र म्हणून लागू केलेल्या ५० गावांपैकी २४ गावांमधील ६३०७ हेक्टर जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू आहे. भूसंपादन संस्थेकडून ३५० कोटी रु पये नुकसानभरपाई रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी ३३६ कोटी रकमेचे वाटपही करण्यात आले आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील गुणवंतांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. या गुणवंतांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात प्रावीण्य संपादन केल्याबद्दल विवेक गणेश थळे, तर हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य संपादन केल्याबद्दल रु पाली कृष्णांत पाटील, शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल खारघरची विद्यार्थिनी मंडल तुंगाद्री, सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालय पेणची विद्यार्थिनी सृष्टी रमेश दारकुंडे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.