शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:35 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक

जयंत धुळपअलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक यांच्यात आता नाराजी नव्हे तर संताप व्यक्त होत आहे. पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने आलेल्या मोटारसायकल, मोटार कार आणि ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स यांच्या मालकांनी एकूण २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा रस्ते कर (रोड टॅक्स) आपल्या वाहनांची पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणी करताना सरकारजमा केला आहे. ‘जनतेचे सरकार...आपले सरकार’ असा विकासाचा डांगोरा पिटणाºया सरकारकडे नियमानुसार रस्ते कर भरून देखील सरकार सुस्थितीतील रस्ते वाहन चालकांना उपलब्ध करून देत नाही, या मुद्द्यांवरून आता वाहन चालक व मालक अत्यंत संतप्त मानसिकतेत आहेत.गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती अलिबागमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे जनसामान्य प्रवासाकरिता एसटी बसचा सर्वाधिक वापर करतात. परंतु ही एसटी बस खड्डे असलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यामधील प्रवाशांना खड्ड्यांमुळे बसणारे धक्के हे मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सचे प्रमुख कारण आहेत. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मुळातच हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात हाडे ठिसूळ बनलेली असतात. त्यातच एसटी बस प्रवासात अचानक आणि सातत्याने बसणाºया धक्क्यांमुळे हाडांचे साधे निखळणे, मणके सरकणे, मणक्यांमध्ये गॅप अशा समस्या निर्माण होतात आणि अशा समस्याग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय शास्त्रात या व्याधीला ‘आॅस्टीओपोरोटिक फ्रॅक्चर’ असे म्हटले जात असल्याचे डॉ.साठे यांनी सांगितले.खड्डेमय दुरवस्थेतील रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना, वाहन चालकांना ते अल्पवेगात चालवावे लागते. परिणामी वाहनाचा गेअर पहिला वा दुसरा ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत वाहन चालवताना पेट्रोल वा डिझेल या इंधनाचा निष्कारण अतिरिक्त वापर होतो आणि त्यातून कार्बन मोनॉक्साईड व अन्य धोकादायक वायू वाहनांच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून वायू प्रदूषणाची पर्यावरणीय समस्या गंभीर बनते आहे. श्वसन व डोळ््याचे आजार त्यातून वाढत आहेत असे जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य पर्यावरण तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बसच्या टायर्सची झीज होवून ्टायर पंक्चर होण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे.एसटीला बसतोय फटका : जिल्ह्यातील रस्त्यांच्या गंभीर दुरवस्थेचा सर्वाधिक आर्थिक फटका सरकारच्याच एसटी महामंडळास बसत असून, मुळातच तोट्यात चालणाºया एसटी महामंडळास अधिक तोटा सोसावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी (पेण) येथील रायगड एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अजितकुमार मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झाली.