शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:35 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक

जयंत धुळपअलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक यांच्यात आता नाराजी नव्हे तर संताप व्यक्त होत आहे. पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने आलेल्या मोटारसायकल, मोटार कार आणि ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स यांच्या मालकांनी एकूण २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा रस्ते कर (रोड टॅक्स) आपल्या वाहनांची पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणी करताना सरकारजमा केला आहे. ‘जनतेचे सरकार...आपले सरकार’ असा विकासाचा डांगोरा पिटणाºया सरकारकडे नियमानुसार रस्ते कर भरून देखील सरकार सुस्थितीतील रस्ते वाहन चालकांना उपलब्ध करून देत नाही, या मुद्द्यांवरून आता वाहन चालक व मालक अत्यंत संतप्त मानसिकतेत आहेत.गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती अलिबागमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे जनसामान्य प्रवासाकरिता एसटी बसचा सर्वाधिक वापर करतात. परंतु ही एसटी बस खड्डे असलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यामधील प्रवाशांना खड्ड्यांमुळे बसणारे धक्के हे मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सचे प्रमुख कारण आहेत. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मुळातच हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात हाडे ठिसूळ बनलेली असतात. त्यातच एसटी बस प्रवासात अचानक आणि सातत्याने बसणाºया धक्क्यांमुळे हाडांचे साधे निखळणे, मणके सरकणे, मणक्यांमध्ये गॅप अशा समस्या निर्माण होतात आणि अशा समस्याग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय शास्त्रात या व्याधीला ‘आॅस्टीओपोरोटिक फ्रॅक्चर’ असे म्हटले जात असल्याचे डॉ.साठे यांनी सांगितले.खड्डेमय दुरवस्थेतील रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना, वाहन चालकांना ते अल्पवेगात चालवावे लागते. परिणामी वाहनाचा गेअर पहिला वा दुसरा ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत वाहन चालवताना पेट्रोल वा डिझेल या इंधनाचा निष्कारण अतिरिक्त वापर होतो आणि त्यातून कार्बन मोनॉक्साईड व अन्य धोकादायक वायू वाहनांच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून वायू प्रदूषणाची पर्यावरणीय समस्या गंभीर बनते आहे. श्वसन व डोळ््याचे आजार त्यातून वाढत आहेत असे जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य पर्यावरण तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बसच्या टायर्सची झीज होवून ्टायर पंक्चर होण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे.एसटीला बसतोय फटका : जिल्ह्यातील रस्त्यांच्या गंभीर दुरवस्थेचा सर्वाधिक आर्थिक फटका सरकारच्याच एसटी महामंडळास बसत असून, मुळातच तोट्यात चालणाºया एसटी महामंडळास अधिक तोटा सोसावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी (पेण) येथील रायगड एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अजितकुमार मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झाली.