शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:35 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक

जयंत धुळपअलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक यांच्यात आता नाराजी नव्हे तर संताप व्यक्त होत आहे. पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने आलेल्या मोटारसायकल, मोटार कार आणि ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स यांच्या मालकांनी एकूण २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा रस्ते कर (रोड टॅक्स) आपल्या वाहनांची पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणी करताना सरकारजमा केला आहे. ‘जनतेचे सरकार...आपले सरकार’ असा विकासाचा डांगोरा पिटणाºया सरकारकडे नियमानुसार रस्ते कर भरून देखील सरकार सुस्थितीतील रस्ते वाहन चालकांना उपलब्ध करून देत नाही, या मुद्द्यांवरून आता वाहन चालक व मालक अत्यंत संतप्त मानसिकतेत आहेत.गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती अलिबागमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे जनसामान्य प्रवासाकरिता एसटी बसचा सर्वाधिक वापर करतात. परंतु ही एसटी बस खड्डे असलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यामधील प्रवाशांना खड्ड्यांमुळे बसणारे धक्के हे मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सचे प्रमुख कारण आहेत. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मुळातच हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात हाडे ठिसूळ बनलेली असतात. त्यातच एसटी बस प्रवासात अचानक आणि सातत्याने बसणाºया धक्क्यांमुळे हाडांचे साधे निखळणे, मणके सरकणे, मणक्यांमध्ये गॅप अशा समस्या निर्माण होतात आणि अशा समस्याग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय शास्त्रात या व्याधीला ‘आॅस्टीओपोरोटिक फ्रॅक्चर’ असे म्हटले जात असल्याचे डॉ.साठे यांनी सांगितले.खड्डेमय दुरवस्थेतील रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना, वाहन चालकांना ते अल्पवेगात चालवावे लागते. परिणामी वाहनाचा गेअर पहिला वा दुसरा ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत वाहन चालवताना पेट्रोल वा डिझेल या इंधनाचा निष्कारण अतिरिक्त वापर होतो आणि त्यातून कार्बन मोनॉक्साईड व अन्य धोकादायक वायू वाहनांच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून वायू प्रदूषणाची पर्यावरणीय समस्या गंभीर बनते आहे. श्वसन व डोळ््याचे आजार त्यातून वाढत आहेत असे जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य पर्यावरण तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बसच्या टायर्सची झीज होवून ्टायर पंक्चर होण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे.एसटीला बसतोय फटका : जिल्ह्यातील रस्त्यांच्या गंभीर दुरवस्थेचा सर्वाधिक आर्थिक फटका सरकारच्याच एसटी महामंडळास बसत असून, मुळातच तोट्यात चालणाºया एसटी महामंडळास अधिक तोटा सोसावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी (पेण) येथील रायगड एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अजितकुमार मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झाली.