शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वणव्यामुळे गुरांचा चारा होतोय नष्ट

By admin | Updated: May 1, 2016 02:35 IST

महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा

दासगाव : महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा आणि पाण्याकरिता भटकंती करत महामार्गावर येत असल्याने वेगाने धावत असलेल्या वाहनांमुळे जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाणात वाढत झाली आहे.महाड तालुक्यातील काही गावांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ग्रामिण आणि दुर्गम भागातील गावांतून पिण्याकरिता पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरीत पाण्याचे नियोजन करण्यात ग्रामस्थ गुंतले असले तरी गावातील जनावरांचे मात्र हाल झाले आहेत. ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे देखील गुरांचा चारा नष्ट झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि चाऱ्याचा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील जनावरे भटकंती करत आहेत. चारा आणि पाण्याच्या शोधात असलेली जनावरे थेट महामार्गावर येत असल्याने अपघातात देखील वाढ झाली आहे. महामार्गावर जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेली महिनाभरात जवळपास ६० जनावरे जखमी झाली आहेत. शुक्रवारी अशाच प्रकारे एका बैलाचा अज्ञात वाहनाचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.महाड तालुक्यातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्या खाडीलगत असल्याने यातील पाणी बारमाही वाहून देखील खारट असल्याने या पाण्याचा वापर गुरांना होत नाही. ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा नियोजनपध्दतीने वितरीत केले जाते. हा पाणीपुरवठा केवळ ग्रामस्थच वापरत असल्याने गुरांना मात्र पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे ही भटकंती या गुरांच्या जिवावर उठत असल्याने महामार्गावर गेली काही दिवसात गुरांचा अपघात होवून दगावण्याच्या घटना घडत आहेत.