शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

वणव्यामुळे गुरांचा चारा होतोय नष्ट

By admin | Updated: May 1, 2016 02:35 IST

महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा

दासगाव : महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा आणि पाण्याकरिता भटकंती करत महामार्गावर येत असल्याने वेगाने धावत असलेल्या वाहनांमुळे जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाणात वाढत झाली आहे.महाड तालुक्यातील काही गावांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ग्रामिण आणि दुर्गम भागातील गावांतून पिण्याकरिता पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरीत पाण्याचे नियोजन करण्यात ग्रामस्थ गुंतले असले तरी गावातील जनावरांचे मात्र हाल झाले आहेत. ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे देखील गुरांचा चारा नष्ट झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि चाऱ्याचा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील जनावरे भटकंती करत आहेत. चारा आणि पाण्याच्या शोधात असलेली जनावरे थेट महामार्गावर येत असल्याने अपघातात देखील वाढ झाली आहे. महामार्गावर जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेली महिनाभरात जवळपास ६० जनावरे जखमी झाली आहेत. शुक्रवारी अशाच प्रकारे एका बैलाचा अज्ञात वाहनाचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.महाड तालुक्यातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्या खाडीलगत असल्याने यातील पाणी बारमाही वाहून देखील खारट असल्याने या पाण्याचा वापर गुरांना होत नाही. ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा नियोजनपध्दतीने वितरीत केले जाते. हा पाणीपुरवठा केवळ ग्रामस्थच वापरत असल्याने गुरांना मात्र पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे ही भटकंती या गुरांच्या जिवावर उठत असल्याने महामार्गावर गेली काही दिवसात गुरांचा अपघात होवून दगावण्याच्या घटना घडत आहेत.