शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कवळे पिता-पुत्रांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

By admin | Updated: January 25, 2017 04:58 IST

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय कवळे आणि त्यांचा मुलगा मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय कवळे आणि त्यांचा मुलगा मिलिंद कवळे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून विजय कवळे ओळखले जायचे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर कवळे यांच्या राजीनाम्यामुळे अलिबाग तालुक्यात उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे.मिलींद कवळे हे सध्या वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. कवळे पिता-पुत्र हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यासह करण्यात येणार आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेंव्हापासून विजय कवळे हे राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे हे त्यांच्यानंतर पक्षामध्ये आले होते. विजय कवळे, प्रकाश धुमाळ हे कायम सुनिल तटकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहीले होते. कवळे आणि धुमाळ हे तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात.विजय कवळे हे सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आहेत, तर मिलींद कवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. कवळे पिता पुत्रांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्याकडे पाठविले आहेत. राजीनाम्याचे स्पष्ट कारण समजू शकले, नसले तरी विकासकामात सहभागी करुन न घेतल्याचा राग त्यांच्या मनात असल्याचे समजते. एमएमआरडीए अंतर्गत अलिबाग तालुक्यात रेल्वे येत आहे. रेल्वे प्रकल्पासाठी सर्वाधिक जागा वरसोली ग्रामस्थांसह कवळे यांची ही संपादीत होणार असल्याचे बोलले जाते. ती जागा वाचवायची असले, तर सत्ता असणाऱ्या पक्षात सहभागी होणे आवश्यक होते. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यामध्यस्तीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना जमीन वाचविण्यासाठी साकडे घालता येईल. यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे.विजय कवळे, मिलींद कवळे यांचा राजीनामा प्राप्त झालेला नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी सांगितले.