शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गणपती सणाला गालबोट लावणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार- डिसीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 19:21 IST

डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे

मधुकर ठाकूर

उरण : डीजे लाऊन ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, गणपतीच्या मंडपात जुगार पत्ते खेळणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी आरास-देखावे उभारणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सक्त ताकीद देतानाच गणेशोत्सव साजरा करताना आपल्या बेकायदा कृतीतून सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी उरण येथे केले. 

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे.त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.या उत्सव साजरे करताना उरण तालुक्यातील नागरिक, गणेश मंडळांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी बुधवारी (२४) संध्याकाळी डिसीपी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उरण पोलिसांनी आनंदी हॉटेलमधील हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीसाठी न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, न्हावा-शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे,उरण मुख्याधिकारी संतोष माळी,उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवणे,नायब तहसीलदार नरेंद्र पेडवी,उरण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे , गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शासकीय कमिट्याचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा,बेकायदेशीर पार्किंगमुळे होणारे वाहतूक कोंडी, भटकी कुत्री- मोकाट गुरे, खड्डेमय रस्ते, तलाव, समुद्र या विसर्जन ठिकाणी होणारी गर्दी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जणू तक्रारींचा पाऊसच पाडला.नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमी सारखी गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारुन नेली. गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार याची सर्वांनी च दक्षता घेण्याचे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले. डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे.विद्युत रोषणाई करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.समाजात तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील असे देखावे, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांची गय केली  जाणार नसल्याचे सक्त ताकीद देतानाच अशी बेकायदा कृत्ये करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सक्तीचा इशाराही शिवराज पाटील यांनी दिला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव