शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

उमरोली पुलावर अडकली कार; पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:31 IST

चालकाच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे वाचले प्राण

पनवेल : दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवार, २० जुलै रोजी याच पुलावरून सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाताना वाचली आहे. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून ९ जुलै रोजी दुचाकीवरून वाहून गेलेल्या सारिका आंब्रे व आदित्य आंब्रे यांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थाचे न ऐकून घेता आदित्य याने दुचाकी पाण्यात टाकल्याने ते वाहून गेले होते. यातील आदित्य याचा मृतदेह ११ जुलै रोजी जुई कामोठे येथे तर सारिका हिचा मृतदेह १७ जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला होता. २० जुलै रोजी पनवेल परिसरात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार सुरु वात केल्याने गाढी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे उमरोलीच्या पुलावरून पाणी वाहून जात होते. पुलावरून फूटभर पाणी वाहून जायला लागल्यावर येथील गावातील ग्रामस्थ बाहेर जाण्याचे थांबतात. मात्र, या गावात सोसायटी झाल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांना या पाण्याचा अंदाज येत नाही व ते या पुलावरून पाणी वाहून जात असतानाही गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. शनिवारी पनवेलच्या दिशेने एमएच ०२ ईपी ९४०१ गाडी येत होती. या वेळी गावातील काही ग्रामस्थ पुलाच्या पलीकडे उभे होते. पाणी जास्त वाहत जात असल्याने त्यांनी या कारचालकाला कार पाण्यात न टाकण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांचे न एकता कारचालकाने आपली कार पाणी वाहून जाणाºया पुलावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याची कार दोन वेळा पाण्याचा प्रवाहामुळे मागून उचलत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रसंगावधान राखून चालकाने कशीबशी कार पलीकडे नेली. या वेळी कारमध्ये तीन महिला व एक कारचालक असे चौघे जण होते. सुदैवाने ते पाण्यात वाहून जाता जाता वाचल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दैव बलवत्तर म्हणून कार वाहून गेली नाही, अशी भावना या वेळी एका नागरिकाने व्यक्त केली. त्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीस दाखल झाले, या वेळी कारचालक एवढा घाबरला होता की त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हते.

पुलाला एक वर्ष लागणारउमरोली येथे जवळपास दीड कोटी रुपयांचा नवीन व उंच असणारा पूल बांधण्यात येत आहे. मात्र, हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले असून, पूल तयार करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.