शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोटला भ्रष्टाचाराचे गालबोट

By admin | Updated: August 29, 2015 22:18 IST

तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता तालुक्यातील अप्पर तुडील या गावातील पाणलोट समितीवर भ्र्रष्टाचाराचे आरोप

दासगाव : तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता तालुक्यातील अप्पर तुडील या गावातील पाणलोट समितीवर भ्र्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम केले गेले, परदेशी वास्तव्यास असलेल्या आणि मयत व्यक्तींच्या नावे असलेल्या शेतजमिनीत काम करणे, ग्रामपंचायतीचा ट्रक्टर काम करताना का वापरला नाही अशा अनेक मुद्यांवरून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी झालेल्या ग्रामसभेत या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असे बिरूद एकात्मिक पाणलोटचे आहे पण आता ‘पाणी अडवा, पैसे जिरवा’ असे उपरोधात्मक बोलले जात आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये पाणलोट भ्रष्टाचार गतवर्षी उघड झाला आहे. महाड तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट भ्रष्टाचाराबाबत फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आमसभेमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या सत्काराचे वेळी नागरीक गोंधळ घालतात. पाणलोटचा सर्वच कारभार भ्रष्ट असल्याबाबत सर्वच ठिकाणी चर्चा सुरू असल्याचे वातावरण सद्या महाड तालुक्यात आहे. कागदोपत्री अगदी काटेकोरपणा बाळगला गेला असला तरी आता पाणलोट समित्यांच्या कारभाराबाबत चौकशीचा फेरा वाढू लागला आहे. पाणलोटच्या माध्यमांतून झालेल्या खर्चाबाबत अनेक माहिती अधिकार पत्र दाखल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यापेक्षा अधिक निधी पाणलोट मार्फत खर्ची पडत आहे. कृषी विभागामार्फत होणारा हा खर्च सर्वस्वी पाणलोट समित्यांच्या मार्फत होत असून खर्चाचे मापदंड सर्वसामान्य नागरिकांसाठी फार कठिण झाले आहे.अप्पर तुडील गावात पाणलोट समितीच्या मार्फत पाण्याची टाकी, सलग समतल चर , जुनी भातशेती दुरुस्ती, अनघड दगडी बांध आदी काम केली गेली आहेत. गावात झालेल्या जुनी भातशेती दुरुस्तीवर ग्रामस्थांचा आक्षेप आहे. जुनी भातशेती दुरुस्ती म्हणजे शेतातील माती ओढून बांध बंदिस्ती करण्याचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम केले गेले. हे काम करताना ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, तो भाड्याने देण्याबाबत ठराव झालेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर वापरावा अशी मागणी होती. मात्र ठेकेदारामार्फत काम केल्याने ग्रामपंचायतीचे मोठे उत्पन्न बुडाले आहे, असा आक्षेप ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला आहे. निधी खर्चात तफावतबांध बंदिस्तीचे हे काम अनिल परशुराम बेल, विजय गोविंद-दिवेकर, हेमराज सुखराम सुर्वे, पूर्वा हेमराज सुर्वे आणि विवेक विजय पालांडे या ठेकेदारांनी केले आहे. अप्पर तुडील गावातील ४९.७१ हेक्टर शेत जमीन दुरुस्त केली. याच्या बदल्यात या पाच ठेकेदारांना १४ लाख ७८ हजार ९७४ रुपये देण्यात आले. मुळात एका टॅ्रक्टरची किंमत ही सुमारे ६ लाख आहे. नवीन टॅ्रक्टरच्या किंमतीच्या दुप्पट काम करण्यात आले. ग्राम पंचायतीकडे स्वत:चा कर्जाने घेतलेला ट्रॅक्टर आहे. ते कर्ज अजूनही फेडले गेलेले नाही. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरला कामाची गरज होती. पण गावातील हे काम केले जात असताना स्वत: ग्रामपंचायतीला डावलण्यात आले. असा आरोपही केला जात आहे. गेली अनेक दिवस या विषयावर गावात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रथम गावात झालेल्या पाणलोट समितीच्या कामाबाबत माहिती अधिकारात अर्ज टाकून माहिती प्राप्त करण्यात आली. त्या माहितीच्या आधारे या कामांची चौकशी झाली पाहिजे असा सूर निर्माण झाला आहे.एकात्मिक पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत शेतीची बांधबंदिस्ती वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगरातील चर, ओढे, नाल्यांवरील बांधारे अशी विविध शेती संबंधीची काम केली जातात. या व्यतिरिक्त कामांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गावच्या विकासासाठी विविध निधीही दिला जातो. या निधीचा विनियोग करण्यासाठी स्वतंत्र नियमावली ही आहे. आता गावातील बचत गटांसाठी वेगळा निधीही आला आहे. यामुळे सर्वात जास्त निधी हा कृषी विभागाकडे खेळत आहे.शनिवारी अप्पर तुडील ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. यावेळी पाणलोट समितीच्या भ्रष्टाचाराचा विषय आला. विद्यमान सरपंच तथा पाणलोट समितीच्या सद्याच्या अध्यक्षा सुनंदा शांताराम निर्मल आणि रिहान फैरोजखान देशमुख यांनी या पाणलोटचा भ्रष्टाचार विषयावर चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर सदर प्रकरणी चौकशी व्हावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. - परमेश्वर तिडके, ग्रामसेवक, अप्पर तुडील ग्रामपंचायत.अप्पर तुडील पाणलोट समितीच्या कामकाजाबाबत कार्यालयाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. शेतीची बांधबंदिस्ती पाणलोट मार्फत केली जाते. यावेळी ७/१२ वरील मयत शेतकऱ्यांच्या परवानगी प्रश्न निर्माण होत नाही. होणारे काम हे समितीमार्फत केले जाते आणि त्याचे पैसे देखील समिती धनादेशाद्वारे आदा केले जाते. कृषी विभाग समितीला मार्गदर्शनांचे काम करते.’- पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी.