शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रेल्वे ट्रॅक वापराचा करार रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:50 IST

अनंत गीते : आरसीएफ कंपनीला भरला दम

अलिबाग : आरसीएफ कंपनीच्या अखत्यारित असणारा रेल्वे ट्रॅक एखाद्या खासगी कंपनी अथवा खासगी पोर्टला वापराला देण्याचा करार केला असेल तर आरसीएफ कंपनीने तो तातडीने रद्द करावा, अन्यथा कारवाईला तयार राहावे, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिला.

अलिबागला रेल्वे सुरू करताना आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर केला जाणार आहे; परंतु याच ठिकाणी एका खासगी कंपनीच्या पोर्टचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर पूर्ण क्षमतेने खासगी कंपनीने केल्यास अलिबागला लोकल आणण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे गीते यांनी पीएनपी या खासगी कंपनीचे नाव न घेता आरसीएफ कंपनीला शिवसेना स्टाइलने फटकारले.

अलिबाग येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात अनंत गीते बोलत होते. अलिबाग रेल्वेने जोडण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पेण आणि रोहे तालुके हे लोकलने जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता माणगावपर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे; परंतु अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेसाठी अडथळा निर्माण होत आहे. येथील रेल्वे ट्रॅक हा आरसीएफच्या मालकीचा आहे. आरसीएफ कंपनी ही सरकारचा अंगीकृत भाग आहे, त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे धाडस करू नये. रेल्वेमंत्री, खत व रसायनमंत्री आणि आरसीएफ प्रशासन यांना याबाबत पत्र व्यवहार करून या संबंधीची माहिती दिली असल्याचेही अनंत गीते यांनी सांगितले.कोकणातील रेल्वे विद्युतीकरण करण्यावर भरअलिबागमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यांना रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यांना रेल्वेची सुविधा दिल्याने अलिबागकरांचेही जीवनमान बदलणार आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे चुकीचे पाऊल उचलू नये, असा इशारा गीते यांनी दिला. कोकणातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, त्यामुळे कोकणात रेल्वे लवकरच विजेवर चालण्यास मदत मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.