शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

करंजा प्रकल्पाची जमीन अधिग्रहण परवानगी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:14 IST

उरण तालुक्यातील करंजा टर्मिनल लॉजिस्टिक या खासगी कंपनीने करंजा येथे बंदराचे काम करताना पर्यावरण, समुद्री जीव आणि मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाची हानी केली आहे.

अलिबाग : उरण तालुक्यातील करंजा टर्मिनल लॉजिस्टिक या खासगी कंपनीने करंजा येथे बंदराचे काम करताना पर्यावरण, समुद्री जीव आणि मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाची हानी केली आहे. या प्रकल्पाने अनेक कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याने, हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे. उद्योग विभागाने कंपनीला दिलेली जमीन अधिग्रहणाची परवानगीही उद्योग विभागाने रद्द केल्याचा दावा अलिबाग येथे पत्रकार परिषदेत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी के ला आहे.प्रकल्पाच्या संचालकांनी वारंवार स्थानिक मच्छीमारांची फसवणूक केली आहे. जेट्टीचे काम पूर्वी पिलर टाकून करणार होते, आता ७० हेक्टर क्षेत्रावर अवाढव्य भराव सुरू केला असल्याने परिसरातील मासेमारी व्यवसायासोबतच मासेमारी प्रजननावर गंभीर परिणाम झाले आहेत. या बंदराच्या उभारणीमुळे करंजामधील मासेमारीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सरकारने मच्छीमारांचे सर्वेक्षण करून बाधित मच्छीमारांच्या याद्या तयार केल्या आहेत. मात्र, त्यांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे कोकण विभागीय उपाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी स्पष्ट केले.करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक कंपनी यांच्यामार्फ त खाडीच्या आंतरभरती क्षेत्रात होत असलेल्या जेट्टीचे बांधकाम पर्यावरण संमतीमधील अटींचे उल्लंघन करून करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची, समुद्री जीवनाची व मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाह हक्कांची हानी होत आहे. याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडे याचिका प्रलंबित असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. करंजा टर्मिनल व लॉजिस्टिक लि. यांच्यासह मुख्य वनसंरक्षक (कांदळवन विभाग) मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथोरिटी, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांना याचिकेत प्रतिवादी केले आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर आदी उपस्थित होते. याबाबत सीइओ जय मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>भरावामुळे वाढला पुराचा धोकाप्रकल्पाला महसूल विभागाने अवैध लाखो ब्रास दगड मातीचा भराव केल्याबद्दल ६१ कोटी २७ लाख ६४ हजार ८०० रुपये इतका दंड ठोठाविला असल्याचे मच्छीमार प्रतिनिधी हेमंत गौरीकर यांनी सांगितले. त्याबाबत प्रशासनानेही वसुलीसाठी काही ठोस कारवाई केली नाही. या प्रकल्पाकडून सरकारला भाडेपट्ट्यापोटी १२ कोटी ६७ लाख ६१ हजार १०५ इतके रुपये देणे आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. भरावामुळे अलिबाग, उरण, पनवेल व पेण या चार तालुक्यांना पुराचा धोका वाढला आहे. सरकार हा खासगी प्रकल्प पुरा करण्याच्या नादात भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकडे दुर्लक्ष करीत आहे, अशाही तक्रारींचा पाढा मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी वाचला.>करंजा टर्मिनल लॉजिस्टिक प्रकल्पाला राज्याच्या उद्योग आयुक्तांकडून प्रकल्पाला जमीन खरेदी करण्यासाठी २००५ मध्ये मिळालेली परवानगी सरकारने मे २०१७ मध्येच रद्द केली आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी व मच्छीमार यांच्या तक्र ारी आहेत, असे असताना हा प्रकल्प रेटून नेण्याचा सरकारचा प्रयत्न निषेधार्ह आहे.- अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, महिला अध्यक्षा,जिल्हा काँग्रेस