शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कर्जतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:14 IST

संख्या वाढली : नागरिकांचा त्रास होणार कमी ; नगरपालिके च्या माध्यमातून काम

कर्जत : शहरात मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. भटक्या कुत्र्यांविरुद्ध कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास कर्जत शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होऊ शकतो.

कर्जत शहराच्या हद्दीवर जवळपासच्या अन्य शहरातील कुत्रे आणून सोडले जातात अशी ओरड नेहमी होत असते. मग ते भटके कुत्रे मोकाटपणे अन्नाच्या शोधात शहरी भागात प्रवेश करतात आणि त्यांना काही खायला मिळाले नाही तर ते कुत्रे मानवी वस्तीत घुसून लोकांना चावे घेतात. कर्जत शहरात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य कर्जतचे नागरिक ठरले आहेत. त्यामुळे कर्जत नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कर्जत नगरपालिका आरोग्य विभागाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्या कामाचा ठेका काढला. नवी मुंबईमधील दि अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने कर्जत शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण कामाचा ठेका मिळविला. त्या ठेक्यामध्ये संबंधित संस्थेने भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांचे निर्बीजीकरण करतानाच त्यांना पकडून आणणे. आठ दिवस सांभाळणे, वाहतूक करणे, शस्त्रक्रिया करणे, अशी कामे ठरवून दिली आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या कुत्र्यांच्या उजव्या कानांवर ‘व्ही’ असे अक्षर लिहून ठेवणे, अशी कामे करण्यासाठी संबंधित संस्थेला नर कुत्र्यासाठी १३०० रुपये, मादीसाठी १४८७ रुपये आणि जखमी कुत्र्यांसाठी ८५० रुपये नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत.

कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात अशा भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यात कुत्रा चावल्यानंतर त्या रुग्णाची होणारी धावपळ जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा उप रुग्णालय यांनी दूर करण्याची गरज आहे. कारण आज तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाच्या लसींचा तुटवडा आहे.

त्याच वेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातही वेगळी परिस्थिती नसून कर्जत तालुक्यातील रुग्णांना मग लस घेण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यात कुत्रा चावल्यानंतर होणारे परिणाम याबाबत जागरूकता नसल्याने रुग्ण घाबरतात आणि ते खासगी रुग्णालयात पोहोचतात, त्यामुळे भटक्या आणि मोकाट कुत्रांचे निर्बीजीकरण ही मोहीम शासनाने हाती घेण्याची गरज आहे, असे मत सामान्य जनता व्यक्त करीत आहे.