शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

केबल आॅपरेटर घोटाळा उघड : प्रशासनाच्या निकालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:43 IST

रायगडमधील केबलचालकांकडून सरकारला किती कर मिळतो, ग्राहकांना पावती देतात की नाही, याबाबतची

अलिबाग : रायगडमधील केबलचालकांकडून सरकारला किती कर मिळतो, ग्राहकांना पावती देतात की नाही, याबाबतची तक्र ार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यावर सहा महिन्यांपूर्वीच सुनावणीही झाली आहे. परंतु या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी याबाबतची तक्र ार दाखल केली होती. केंद्र सरकारने सेटटॉप बॉक्सची सक्ती केली असताना अलिबागमध्ये केबल आॅपरेटर्सने विनापावती ग्राहकांकडून सुमारे ५० कोटी रु पये लुबाडले असल्याचा महाघोटाळा सावंत यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात येवून या प्रकरणाचा तपास थेट आयकर विभागामार्फत सुरू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्राहकांची लूट करून सरकारची फसवणूक करणाऱ्या टीव्ही केबल आॅपरेटर्सचे चांगलेच धाबे दणाणले.जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार यांच्यामार्फत अहवाल मागवला होता. त्यामध्ये कोट्यवधींचा महाघोटाळा समोर आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सुनावणी लावली होती.अप्पर जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये २७ सप्टेंबर २०१७ रोजी तक्र ादार सावंत यांनी आपले अंतिम म्हणणे सादर केले होते. परंतु सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अपर जिल्हाधिकारी निकाल देत नसल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.येत्या आठ दिवसांत याबाबत निकाल दिला नाही तर योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून या प्रकरणी दाद मागण्याचा निर्धार सावंत यांनी व्यक्त केला आहे. मनोरंजन, संस्कृती आणि खेळविषयक सेवा यावर १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर बसविण्यात आला आहे. त्यामुळे जुलै २०१७ पासून महसूल विभागाकडून करमणूक कर वसूल केला जात नाही. केबल चालकांवर कारवाई झालीच पाहिजे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे.