शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आढी गवळवाडीत बांधलेले बंधारे गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:50 IST

आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा होती ती विहीर वर्षभर पडक्या अवस्थेत असून दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.महाड तालुक्यातील आढी गावात कृषी विभागाने, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ माध्यमातून पाणलोटमधून बंधारे बांधले खरे; पण हे सर्व बंधारे मातीच्या गाळाने भरले आहेत. गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावर कृषी विभागाने वर्षभरापूर्वी जवळपास तीन बंधारे बांधले आहेत. हे काँक्रीटचे बंधारे मातीने भरून गेले तर काही बंधारे कोसळून गेले आहेत. यामुळे मुख्य उद्देश या ठिकाणी सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी दोन विहिरी आहेत. यातील एक विहीर वर्षभरापूर्वी कोसळली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने ही विहीर अद्याप दुरुस्त केलेली नाही. यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील वापर करता येत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, या विहिरीतील पाणी मे अखेरपर्यंत पिण्यास मिळत असल्याने या विहिरीची दुुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.सद्यस्थितीत वाडीजवळ असलेल्या एका विहिरीतील पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. मात्र, हे पाणी फार काळ टिकून राहत नाही. यामुळे आतपासूनच बैलगाडीवर छोटे पिंप टाकून पिण्याचे पााणी आणण्याचे काम येथील तरुण करत आहेत. स्वदेस संस्थेने गावात नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र, या योजनेवर पाणी कमी असल्याने दोन दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले. सध्या तरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते.भौगोलिक स्थिती पाहून गवळीवाडीचा वीर ग्रा. पं. मध्ये समावेश करावातालुक्यातील आढी गाव हे डोंगरावर वसले आहे. या गावाकडे जाणारा मार्ग लोणेरे गोरेगावमधून आहे. वीर गावापासून आढी गावाची गवळीवाडी फक्त एक ते दीड किमी अंतरावर आले. येथून आढी गावात जायचे असेल तर एक तासाची पायपीट करून गावात जावे लागते. आढी गवळीवाडीला रस्तादेखील वीर गावातूनच आहे. जेमतेम २० ते २५ घरांच्या वाडीत ग्रामस्थांना एखाद्या दाखल्याकरिता मात्र तासाभराची पायपीट किंवा लोणेरे मार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाडीचा समावेश वीर ग्रामपंचायतीत करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड