शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

आढी गवळवाडीत बांधलेले बंधारे गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:50 IST

आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा होती ती विहीर वर्षभर पडक्या अवस्थेत असून दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.महाड तालुक्यातील आढी गावात कृषी विभागाने, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ माध्यमातून पाणलोटमधून बंधारे बांधले खरे; पण हे सर्व बंधारे मातीच्या गाळाने भरले आहेत. गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावर कृषी विभागाने वर्षभरापूर्वी जवळपास तीन बंधारे बांधले आहेत. हे काँक्रीटचे बंधारे मातीने भरून गेले तर काही बंधारे कोसळून गेले आहेत. यामुळे मुख्य उद्देश या ठिकाणी सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी दोन विहिरी आहेत. यातील एक विहीर वर्षभरापूर्वी कोसळली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने ही विहीर अद्याप दुरुस्त केलेली नाही. यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील वापर करता येत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, या विहिरीतील पाणी मे अखेरपर्यंत पिण्यास मिळत असल्याने या विहिरीची दुुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.सद्यस्थितीत वाडीजवळ असलेल्या एका विहिरीतील पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. मात्र, हे पाणी फार काळ टिकून राहत नाही. यामुळे आतपासूनच बैलगाडीवर छोटे पिंप टाकून पिण्याचे पााणी आणण्याचे काम येथील तरुण करत आहेत. स्वदेस संस्थेने गावात नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र, या योजनेवर पाणी कमी असल्याने दोन दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले. सध्या तरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते.भौगोलिक स्थिती पाहून गवळीवाडीचा वीर ग्रा. पं. मध्ये समावेश करावातालुक्यातील आढी गाव हे डोंगरावर वसले आहे. या गावाकडे जाणारा मार्ग लोणेरे गोरेगावमधून आहे. वीर गावापासून आढी गावाची गवळीवाडी फक्त एक ते दीड किमी अंतरावर आले. येथून आढी गावात जायचे असेल तर एक तासाची पायपीट करून गावात जावे लागते. आढी गवळीवाडीला रस्तादेखील वीर गावातूनच आहे. जेमतेम २० ते २५ घरांच्या वाडीत ग्रामस्थांना एखाद्या दाखल्याकरिता मात्र तासाभराची पायपीट किंवा लोणेरे मार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाडीचा समावेश वीर ग्रामपंचायतीत करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड