शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आढी गवळवाडीत बांधलेले बंधारे गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:50 IST

आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा होती ती विहीर वर्षभर पडक्या अवस्थेत असून दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.महाड तालुक्यातील आढी गावात कृषी विभागाने, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ माध्यमातून पाणलोटमधून बंधारे बांधले खरे; पण हे सर्व बंधारे मातीच्या गाळाने भरले आहेत. गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावर कृषी विभागाने वर्षभरापूर्वी जवळपास तीन बंधारे बांधले आहेत. हे काँक्रीटचे बंधारे मातीने भरून गेले तर काही बंधारे कोसळून गेले आहेत. यामुळे मुख्य उद्देश या ठिकाणी सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी दोन विहिरी आहेत. यातील एक विहीर वर्षभरापूर्वी कोसळली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने ही विहीर अद्याप दुरुस्त केलेली नाही. यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील वापर करता येत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, या विहिरीतील पाणी मे अखेरपर्यंत पिण्यास मिळत असल्याने या विहिरीची दुुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.सद्यस्थितीत वाडीजवळ असलेल्या एका विहिरीतील पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. मात्र, हे पाणी फार काळ टिकून राहत नाही. यामुळे आतपासूनच बैलगाडीवर छोटे पिंप टाकून पिण्याचे पााणी आणण्याचे काम येथील तरुण करत आहेत. स्वदेस संस्थेने गावात नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र, या योजनेवर पाणी कमी असल्याने दोन दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले. सध्या तरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते.भौगोलिक स्थिती पाहून गवळीवाडीचा वीर ग्रा. पं. मध्ये समावेश करावातालुक्यातील आढी गाव हे डोंगरावर वसले आहे. या गावाकडे जाणारा मार्ग लोणेरे गोरेगावमधून आहे. वीर गावापासून आढी गावाची गवळीवाडी फक्त एक ते दीड किमी अंतरावर आले. येथून आढी गावात जायचे असेल तर एक तासाची पायपीट करून गावात जावे लागते. आढी गवळीवाडीला रस्तादेखील वीर गावातूनच आहे. जेमतेम २० ते २५ घरांच्या वाडीत ग्रामस्थांना एखाद्या दाखल्याकरिता मात्र तासाभराची पायपीट किंवा लोणेरे मार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाडीचा समावेश वीर ग्रामपंचायतीत करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड