शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

घराचे बांधकाम करणे झाले महाग, भाव वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:56 IST

Raigad : २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

अलिबाग :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये बांधकाम उद्योग ही सुटलेला नाही. सिमेंट, वाळू, वीट व स्टील आदी साहित्याच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चही वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे बजेट पुरते कोलमडले आहे.२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने सुरू असलेले, अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. टाळेबंदीपूर्वी अनेक प्रकल्प प्रस्तावित होते.  रायगड जिल्ह्यात विकासकांनी गृहप्रकल्पाची घोषणा करून, त्यावेळच्या दरानुसार नोंदणी केली होती, परंतु कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत त्याच दराने घराची विक्री करणे विकासकांना शक्य नसल्याने, अनेकांनी ग्राहकांकडे जास्त रकमेची मागणी केल्याची उदाहरणे आहेत. टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद होती. त्यामुळे इतर राज्यांतून पुरेसा कच्चा माल उपलब्ध झाला नाही. सरकारची परवानगी नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून दगडखाणी बंद आहेत. त्यामुळे खडी, गिट्टी, दगडी, गोठळी, रेजगा आदी पुरवठाही कमी झाला आहे.  यातच किमती वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी कच्च्या मालाचा मर्यादित साठा करून ठेवला आहे.  यामुळे  बांधकाम व्यवसायिक संकटात सापडले आहेत.

 बांधकाम साहित्याचे दर का वाढले?संचारबंदी व टाळेबंदीत सर्वच व्यवसाय बंद होते. वाहतूक यंत्रणाही बंद होत्या. या काळात मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने बांधकाम साहित्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. आता अनलॉकमध्येही पुरेसे मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन घटले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात मजूर मिळत नव्हते. याचा सर्वात जास्त परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे वाळू, सिमेंट, वीट, ग्रीटचे दर वाढले आहेत. कच्या मालाला मागणी असली, तरी साठा मर्यादित आहे, तर पुढील काही महिने अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.- रणजीत म्हात्रे, बांधकाम साहित्यविक्रेता

टॅग्स :Raigadरायगड