शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खारबंदिस्तीसाठी अंदाजपत्रक

By admin | Updated: May 27, 2016 03:52 IST

तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे

- आविष्कार देसाई,  अलिबागतालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे खारबंदिस्तीची कामे सुरु होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. खारभूमी विभागाने अंदाजपत्रक तयार करण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा एक प्रकारे विजयच असल्याचे बोलले जाते. खारभूमी विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय नसल्याने यासाठी येणारा सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च जलसंपदा मंत्रालयाच्या तिजोरीतून द्यावा लागणार आहे. श्रमिक मुक्ती दलासोबत गुरुवारी खारभूमी अधिकारी यांची या प्रश्नी बैठक पार पडली.खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले आणि होत असलेले नुकसान भरुन देण्याची मागणी येथील श्ोतकऱ्यांनी संघटितपणे केली आहे. खारभूमी अधिकारी कार्यालयात ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी ठरल्याप्रमाणे गुुरुवारी अर्ज दाखल केले. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार असल्याचे निश्चितपणे मानले जात आहे. खारेपाटातील शेतकरी हा भात आणि मासे यांच्याबाबतीत समृध्द होता. कालांतराने खारभूमी विभागाने खारबंदिस्तीकडे योग्य लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकत्या शेतामध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून तेथील शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे खारभूमी विभागाने भरुन द्यावे, यासाठी शेतकरी संघटित झाले. नुकसानभरपाई प्राप्त करण्यासाठी त्यांनी गुरुवारपासून अर्ज करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली. त्याचप्रमाणे कृषी विभाग, तलाठी, भूमिअभिलेख यांची संयुक्त बैठक लवकरच लावण्यात येणार आहे. कुर्डूस ते हाशिवरे या खारेपाट विभागातील खारबंदिस्तीचे सर्व्हेक्षण करुन कामाचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत करण्यात येईल असे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी सांगितल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याप्रसंगी आर.सी.पाटील, सुनील पाटील, शाखा अभियंता सुरेश शिरसाट यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ५४१शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली.श्रमिक मुक्ती दलासोबत बैठक पार पडली. खारबंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी दोन योजनांचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत तयार करण्यात येणार आहे.-एस.पी.पवार, सहायक कार्यकारी अभियंता