शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

खारबंदिस्तीसाठी अंदाजपत्रक

By admin | Updated: May 27, 2016 03:52 IST

तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे

- आविष्कार देसाई,  अलिबागतालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे खारबंदिस्तीची कामे सुरु होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. खारभूमी विभागाने अंदाजपत्रक तयार करण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा एक प्रकारे विजयच असल्याचे बोलले जाते. खारभूमी विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय नसल्याने यासाठी येणारा सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च जलसंपदा मंत्रालयाच्या तिजोरीतून द्यावा लागणार आहे. श्रमिक मुक्ती दलासोबत गुरुवारी खारभूमी अधिकारी यांची या प्रश्नी बैठक पार पडली.खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले आणि होत असलेले नुकसान भरुन देण्याची मागणी येथील श्ोतकऱ्यांनी संघटितपणे केली आहे. खारभूमी अधिकारी कार्यालयात ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी ठरल्याप्रमाणे गुुरुवारी अर्ज दाखल केले. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार असल्याचे निश्चितपणे मानले जात आहे. खारेपाटातील शेतकरी हा भात आणि मासे यांच्याबाबतीत समृध्द होता. कालांतराने खारभूमी विभागाने खारबंदिस्तीकडे योग्य लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकत्या शेतामध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून तेथील शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे खारभूमी विभागाने भरुन द्यावे, यासाठी शेतकरी संघटित झाले. नुकसानभरपाई प्राप्त करण्यासाठी त्यांनी गुरुवारपासून अर्ज करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली. त्याचप्रमाणे कृषी विभाग, तलाठी, भूमिअभिलेख यांची संयुक्त बैठक लवकरच लावण्यात येणार आहे. कुर्डूस ते हाशिवरे या खारेपाट विभागातील खारबंदिस्तीचे सर्व्हेक्षण करुन कामाचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत करण्यात येईल असे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी सांगितल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याप्रसंगी आर.सी.पाटील, सुनील पाटील, शाखा अभियंता सुरेश शिरसाट यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ५४१शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली.श्रमिक मुक्ती दलासोबत बैठक पार पडली. खारबंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी दोन योजनांचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत तयार करण्यात येणार आहे.-एस.पी.पवार, सहायक कार्यकारी अभियंता