शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:33 IST

विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.

अलिबाग : जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकमताने काम करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. ज्या यंत्रणांचा निधी खर्च न होता शासनास समर्पित होईल, अशा यंत्रणांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चव्हाण होते. ते म्हणाले, २०१८-१९ साठी रायगड जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत १८९ कोटी १७ लाख रु पये, विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ९४ लाख रु पये व आदिवासी उपयोजनेसाठी ५५ कोटी ९५ लाख असा एकूण २७० कोटीरु पयांचा आराखडा आहे. निधी खर्च करून जिल्ह्यातील विकासकामे करावयाची आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक कालावधी लक्षात घेता खूप कमी कालावधी उपलब्ध होईल, त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकानिहायकचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात, तसेच नव्याने निर्माण होत असलेल्या नागरी वसाहतींमधील सांडपाण्याच्या प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाºयांची समिती पाहणी करून अभ्यास करतील. त्यानंतर या बाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडित पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड