शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:33 IST

विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.

अलिबाग : जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकमताने काम करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. ज्या यंत्रणांचा निधी खर्च न होता शासनास समर्पित होईल, अशा यंत्रणांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चव्हाण होते. ते म्हणाले, २०१८-१९ साठी रायगड जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत १८९ कोटी १७ लाख रु पये, विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ९४ लाख रु पये व आदिवासी उपयोजनेसाठी ५५ कोटी ९५ लाख असा एकूण २७० कोटीरु पयांचा आराखडा आहे. निधी खर्च करून जिल्ह्यातील विकासकामे करावयाची आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक कालावधी लक्षात घेता खूप कमी कालावधी उपलब्ध होईल, त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकानिहायकचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात, तसेच नव्याने निर्माण होत असलेल्या नागरी वसाहतींमधील सांडपाण्याच्या प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाºयांची समिती पाहणी करून अभ्यास करतील. त्यानंतर या बाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडित पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड