शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाली शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:34 IST

नागरिक संतप्त । पाली पोस्ट कार्यालयातील काम ठप्प, खातेदारांची गैरसोय

विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुक्यातील पाली शहरात असलेल्या बीएसएनएलच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पाली पोस्ट कार्यालयातील कामकाज मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना सतत फेºया माराव्या लागत असल्याने खातेधारकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.पोस्टात ज्येष्ठ नागरिक आपले महिन्याचे व्याज घेण्यासाठी येत असतात. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर पत्रे पाठविण्यासाठी, टेलिफोन बिले भरण्यासाठी, पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा विमा भरण्यासाठीही लोक येतात. या सर्व सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सर्वच उप-टपाल कार्यालयात (सब पोस्ट आॅफिस) अपुरा कर्मचारी वर्ग व संथगतीने चालणाºया इंटरनेटमुळे गेले महिनाभर नागरिकांची कामे खोळंबली आहेत. यामुळे पोस्टात येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. पोस्ट आॅफिस कार्यालयांमध्ये कर्मचारी वाढवावेत, यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अगोदर पोस्ट आॅफिसमध्ये ‘संचय पोस्ट’ हे कम्प्युटर सॉफ्टवेअर सुरू होते. मात्र, त्यानंतर कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली असून, नवीन सॉफ्टवेअरवर पोस्ट कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. इंटरनेटवर सर्व माहिती टाकून वापर सुरू झाल्याने समस्या निर्माण झाल्याचे पोस्ट कर्मचाºयानी सांगितले. बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन येथे आहे. हे नेट अनेकदा संथगतीने चालते, तर बहुतांश वेळा नेट बंद झाल्याने पूर्णपणे कामे खोळंबतात. कोअर बँकिंगचे पिनॅकल हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे.नवीन सॉफ्टवेअर व कमी मनुष्यबळामुळे समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. बीएसएनएलचे नेट सतत बंद पडत असेल, तर पोस्ट विभागाने पर्यायी खासगी नेट घ्यायला हवे. गैरसोय का करता, ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय1गेल्या अनेक दिवसांपासून आमचे व्याजाचे पैसे मिळत नाहीत व इतर आर्थिक व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. नेट बंद आहे असे उत्तर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला व्याजाचे पैसे घ्यायला पोस्टात जावे लागते. वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ज्येष्ठांच्या महिन्याचे वेळापत्रक कोलमडून जाते. अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक दुसºया व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पोस्टात पाठवतात. मात्र, अशा गोंधळामुळे ज्येष्ठांना वेळेवर पेसे मिळत नाहीत, असे खातेदारांनी सांगितले. पोस्टाच्या या गोंधळामुळे खातेदारांची सहनशीलता संपली आहे. आता आंदोलन करण्याचा इशारा काहींनी दिला आहे.स्पीड पोस्ट जाणे बंद2स्पीड पोस्ट वेळेत जाणे आवश्यक आहे. मात्र, पोस्ट आॅफिसमध्ये कम्प्युटर बंद असल्याने स्पीड पोस्ट जाणेही बंद आहेत. वीजपुरवठा खंडित झाला की, पोस्टातील कामावर परिणाम होतो. इंटरनेट व कम्प्युटरवर जी कामे अवलंबून आहेत ती सर्व कामे बंद होतात. पोस्टाचे एजंटही या सर्वप्रकाराला कंटाळले आहेत. एजंटकडे जमा झालेले खातेधारकांचे लाखो रुपयांचे चेक पोस्टात जमा होऊ शकलेले नाहीत. नवीन खाती उघडली जात नाहीत. पोस्ट कार्यालयात दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.माझी आई खूप आजारी आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात घेऊन जायचे आहे, त्याकरिता मी माझे पोस्टातील खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पाली पोस्ट कार्यालयात फेºया मारत आहे. मात्र, तेथील अधिकारी नेट नसल्याचे कारण सांगत आम्हाला परत पाठवीत आहेत. स्वकष्टाचे पैसे असूनही उपचारासाठी मिळत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.- शीला गायकवाड, नाडसूरजानेवारी महिन्यापासून पाली पोस्ट आॅफिसमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी संथगतीने सुरू असते तर कधी कधी पूर्णत: बंद. अनेकदा त्यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पर्यायी नेटवर्क वापरतो त्याचा राउटर खराब झाला आहे. त्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असून लवकरच व्यवस्था होईल.- एम. पी. कोनकर, उप डाकपाल, पाली कार्यालयगेले महिनाभर पाली पोस्ट आॅफिसमध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत असल्याने ग्राहकांना रोज फेºया माराव्या लागत आहेत. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ज्या दिवशी नेटवर्किंग बंद असेल, त्या दिवशी आॅफ लाइन कामकाज करून जुन्या पद्धतीने स्लीपवर व्यवहार करण्यात यावा, अशी मागणी ग्राहकांची आहे.- किरण राऊत, शिवसैनिक

टॅग्स :RaigadरायगडBSNLबीएसएनएल