शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

मुठवली कालवण नदीचा पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:59 IST

मुठवली-कालवण-पाणसई या गावांमध्ये जाणारा कशेणे गावाजवळच्या रस्त्याची तसेच नदी पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.

गिरीश गोरेगावकर माणगाव : तालुक्यातील मुठवली-कालवण-पाणसई या गावांमध्ये जाणारा कशेणे गावाजवळच्या रस्त्याची तसेच नदी पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावरून कोकण रेल्वेचे काम करणाºया एका ठेकेदाराने अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाचा काही भाग खचला आहे. त्यामुळे परिसरातील चालक तसेच नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.पूल कोसळल्यास चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पुलाच्या दुरुस्तीबाबत तहसीलदार तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र तरीही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी तसेच चार गावांतील मुलांना शिक्षणासाठी नदी पूल ओलांडून जावे लागते. याशिवाय रात्री अपरात्री कोणी आजारी पडला तर त्याला जाण्यासाठी कुठला पर्यायी मार्गच नसल्याने याच खचलेल्या नदीपुलावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. पुलाची वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, तसेच जीवितहानी होऊ शकते. पुलाच्या बाजूलाच कशेणे रेल्वे कारशेड स्थानकाचे मोठे काम होत असून रेल्वे रु ंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे पुलावरून बांधकामासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांतून पुलावरून ने-आण केले जाते. जून महिन्यात हा पूल खचला. अवजड वाहनांमुळे हा नदी पूल व रस्ता खराब झाला असून रेल्वेचे काम करीत असलेला ठेकेदारच यासाठी जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी ठेकेदाराला रस्ता आणि पुलाच्या दैनावस्थेबाबत जाब विचारल्यावर, ठेकेदाराने रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली. पूल मात्र अद्याप खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.