शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

तात्पुरती सोय म्हणून लोखंडी पट्टीचा पूल केला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:31 IST

संजय गायकवाड कर्जत : नेरळ धरणाच्या खाली असलेला लहान पूल मार्च महिन्यात वाहून गेला होता, त्या पुलासाठी रायगड जिल्हा परिषदेने निधी देण्याचे मंजूर केले होते. मात्र, निधी न मिळाल्याने तात्पुरती सोय म्हणून लोखंडी पट्टीचा पूल तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पूल वाहतुकीस सुरक्षित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.नेरळ ग्रामपंचायतच्या मागील भागात ...

संजय गायकवाड कर्जत : नेरळ धरणाच्या खाली असलेला लहान पूल मार्च महिन्यात वाहून गेला होता, त्या पुलासाठी रायगड जिल्हा परिषदेने निधी देण्याचे मंजूर केले होते. मात्र, निधी न मिळाल्याने तात्पुरती सोय म्हणून लोखंडी पट्टीचा पूल तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पूल वाहतुकीस सुरक्षित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.नेरळ ग्रामपंचायतच्या मागील भागात काही आदिवासी वाड्या आणि एक मोठी वस्ती आहे. त्यांना जाण्यासाठी ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली एक कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता. मात्र, त्या पुलावरून सातत्याने अवजड वाहतूक होत राहिल्याने पूल २७ मार्च रोजी कोसळला. पूल तुटल्याने परिसरातील ग्रामस्थांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागे, त्यामुळे लवकरात लवकर पुलाची निर्मिती व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती.पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने तेथे कमी रुं दीचा एक पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा लोखंडी पूल असून किती काळ टिकेल, हेही सांगता येत नाही. तात्पुरती सोय म्हणून हा पूल उभारण्यात आला असला तरी यावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. पुलावरून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची नियमित वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना होणेही गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेआहे.दुसरीकडे तेथे नवीन पुलाची निर्मिती करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने २२ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मात्र, त्या अंदाजपत्रकाचे काय झाले? हादेखील प्रश्न आहे.तात्पुरती सोय या नावाखाली नेरळ सारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतीने लोखंडी प्लेट टाकून पूल बनवल्या प्रकरणी खुद्द ग्रामपंचायत उपसरपंच अंकुश शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांची पूल बनवायची जबाबदारी होती, त्यांनी वेळकाढू धोरणाचा अवलंब केल्याने ग्रामस्थांना लोखंडी प्लेटवरून नाला पार करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ा पुलाला लोखंडी पट्टीची मात्रा