शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ पूल धोकादायक अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 23:46 IST

सावित्रीची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण? नूतनीकरणाला मुहूर्त मिळेना

बिरवाडी : खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ नदीपात्रावरील पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक विचारत आहेत,या पुलावरून पुणे, भोर, पिंपळवाडी, गोठवली, किये, बारसगाव, खरवली, ढालकाठी, बिरवाडी, येथील नागरिक, वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात.

शालेय विद्यार्थी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे कामगार यांना याच पुलाचा वापर करून काळ नदीचे पात्र ओलांडावे लागते. सदर पूल धोकादायक असल्याने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचनाही आमदार भारत गोगावले यांनी लेखी निवेदनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. सुमारे पाच कोटी रुपये एवढा निधी शासनातर्फे या पुलाच्या नूतनीकरणाकरिता मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला मुहूर्त सापडत नसल्याची बाब समोर आली आहे .

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत नेते प्रभाकर पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या पुलाची निर्मिती केली होती.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे न झाल्याने सद्यस्थितीमध्ये हा पूल वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पुलाच्या नूतनीकरणाकरिता रायगडचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी पावणे दोन कोटी निधी मंजूर केला होता. सदरचा निधी अपुरा पडत असल्याने गोगावले यांनी पाठपुरावा करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, तरीही या नूतनीकरणाचे काम लालफितीत अडकले आहे. या धोकादायक पुलाची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड