शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ पूल धोकादायक अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 23:46 IST

सावित्रीची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण? नूतनीकरणाला मुहूर्त मिळेना

बिरवाडी : खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ नदीपात्रावरील पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक विचारत आहेत,या पुलावरून पुणे, भोर, पिंपळवाडी, गोठवली, किये, बारसगाव, खरवली, ढालकाठी, बिरवाडी, येथील नागरिक, वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात.

शालेय विद्यार्थी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे कामगार यांना याच पुलाचा वापर करून काळ नदीचे पात्र ओलांडावे लागते. सदर पूल धोकादायक असल्याने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचनाही आमदार भारत गोगावले यांनी लेखी निवेदनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. सुमारे पाच कोटी रुपये एवढा निधी शासनातर्फे या पुलाच्या नूतनीकरणाकरिता मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाला मुहूर्त सापडत नसल्याची बाब समोर आली आहे .

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत नेते प्रभाकर पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या पुलाची निर्मिती केली होती.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे न झाल्याने सद्यस्थितीमध्ये हा पूल वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पुलाच्या नूतनीकरणाकरिता रायगडचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी पावणे दोन कोटी निधी मंजूर केला होता. सदरचा निधी अपुरा पडत असल्याने गोगावले यांनी पाठपुरावा करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, तरीही या नूतनीकरणाचे काम लालफितीत अडकले आहे. या धोकादायक पुलाची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड