शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

उमरठ येथे वधूने घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी

- आविष्कार देसाई, अलिबाग

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी पडतात, परंतु या सात शपथेव्यतिरिक्त आठवी शपथ आयुष्यात महत्त्वाची असल्याचे वधूने दाखवून दिले. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील लग्न सोहळ््यात वधूने स्वच्छतेची आठवी शपथ घेऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव तानाजी मालसुरे यांचे जन्म गाव आहे. ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली त्याचा जल्लोष थेट लग्न मंडपात करुन स्वच्छतेचा नवा पायंडा पाडला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य उत्तम कोळंबे यांनी वधूला अहेरामध्ये शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले. वधूनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केले होते. ते वृत्त वाचून स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होते. रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन जोमाने राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत होणारी जागृती पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. २०१९ सालापर्यंत रायगड जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रतिवर्षी सुमारे तीस हजार वैयक्तिक शौचालये निर्माण करावी लागणार आहेत. उमरठ गावातील ग्रामस्थ नामदेव कळंबे यांची मुलगी सुप्रिया हिने स्वत:च्या लग्न सोहळ््यात स्वच्छतेची शपथ घेतली. लग्न सोहळ््यासाठी आलेल्या उमरठ, रामाचे उमरठ, गोवले, खोपट, बोरज, साखर, करंजे, लहुळसा, मोरसडे यासह अन्य गावातील सुमारे ५०० उपस्थितांनाही तिने स्वच्छतेची शपथ दिली.ग्रामपंचायतीमार्फत सुप्रिया हिच्या सासरी शौचालय बांधून देण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी सांगितले. स्वच्छतेची सवय महत्त्वाची- के वळ टार्गेट पूर्ण न करता समाजाला स्वच्छतेची सवय लागणे महत्त्वाचे आहे. पाणी व स्वच्छता मिशनचे सुरु असलेले कार्य समाजापर्यंत पोचत असल्याचे लग्न सोहळ््यातील कृतीवरुन समोर आल्याचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, उमरठ सरपंच विमल कळंबे, उपसरपंच इंद्रजित कळंबे, एम.एस.पोतकुले, ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.