शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

उमरठ येथे वधूने घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी

- आविष्कार देसाई, अलिबाग

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी पडतात, परंतु या सात शपथेव्यतिरिक्त आठवी शपथ आयुष्यात महत्त्वाची असल्याचे वधूने दाखवून दिले. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील लग्न सोहळ््यात वधूने स्वच्छतेची आठवी शपथ घेऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव तानाजी मालसुरे यांचे जन्म गाव आहे. ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली त्याचा जल्लोष थेट लग्न मंडपात करुन स्वच्छतेचा नवा पायंडा पाडला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य उत्तम कोळंबे यांनी वधूला अहेरामध्ये शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले. वधूनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केले होते. ते वृत्त वाचून स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होते. रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन जोमाने राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत होणारी जागृती पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. २०१९ सालापर्यंत रायगड जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रतिवर्षी सुमारे तीस हजार वैयक्तिक शौचालये निर्माण करावी लागणार आहेत. उमरठ गावातील ग्रामस्थ नामदेव कळंबे यांची मुलगी सुप्रिया हिने स्वत:च्या लग्न सोहळ््यात स्वच्छतेची शपथ घेतली. लग्न सोहळ््यासाठी आलेल्या उमरठ, रामाचे उमरठ, गोवले, खोपट, बोरज, साखर, करंजे, लहुळसा, मोरसडे यासह अन्य गावातील सुमारे ५०० उपस्थितांनाही तिने स्वच्छतेची शपथ दिली.ग्रामपंचायतीमार्फत सुप्रिया हिच्या सासरी शौचालय बांधून देण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी सांगितले. स्वच्छतेची सवय महत्त्वाची- के वळ टार्गेट पूर्ण न करता समाजाला स्वच्छतेची सवय लागणे महत्त्वाचे आहे. पाणी व स्वच्छता मिशनचे सुरु असलेले कार्य समाजापर्यंत पोचत असल्याचे लग्न सोहळ््यातील कृतीवरुन समोर आल्याचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, उमरठ सरपंच विमल कळंबे, उपसरपंच इंद्रजित कळंबे, एम.एस.पोतकुले, ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.