शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

उमरठ येथे वधूने घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी

- आविष्कार देसाई, अलिबाग

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी पडतात, परंतु या सात शपथेव्यतिरिक्त आठवी शपथ आयुष्यात महत्त्वाची असल्याचे वधूने दाखवून दिले. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील लग्न सोहळ््यात वधूने स्वच्छतेची आठवी शपथ घेऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव तानाजी मालसुरे यांचे जन्म गाव आहे. ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली त्याचा जल्लोष थेट लग्न मंडपात करुन स्वच्छतेचा नवा पायंडा पाडला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य उत्तम कोळंबे यांनी वधूला अहेरामध्ये शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले. वधूनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केले होते. ते वृत्त वाचून स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होते. रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन जोमाने राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत होणारी जागृती पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. २०१९ सालापर्यंत रायगड जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रतिवर्षी सुमारे तीस हजार वैयक्तिक शौचालये निर्माण करावी लागणार आहेत. उमरठ गावातील ग्रामस्थ नामदेव कळंबे यांची मुलगी सुप्रिया हिने स्वत:च्या लग्न सोहळ््यात स्वच्छतेची शपथ घेतली. लग्न सोहळ््यासाठी आलेल्या उमरठ, रामाचे उमरठ, गोवले, खोपट, बोरज, साखर, करंजे, लहुळसा, मोरसडे यासह अन्य गावातील सुमारे ५०० उपस्थितांनाही तिने स्वच्छतेची शपथ दिली.ग्रामपंचायतीमार्फत सुप्रिया हिच्या सासरी शौचालय बांधून देण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी सांगितले. स्वच्छतेची सवय महत्त्वाची- के वळ टार्गेट पूर्ण न करता समाजाला स्वच्छतेची सवय लागणे महत्त्वाचे आहे. पाणी व स्वच्छता मिशनचे सुरु असलेले कार्य समाजापर्यंत पोचत असल्याचे लग्न सोहळ््यातील कृतीवरुन समोर आल्याचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, उमरठ सरपंच विमल कळंबे, उपसरपंच इंद्रजित कळंबे, एम.एस.पोतकुले, ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.