शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बीएमसीटी प्रशासनाचा नोकरभरतीसाठी ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:09 IST

जेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

उरण : जेएनपीटीच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदर प्रशासना (बीएमसीटी)ने १७ महिलांची नोकरभरती करण्यास तूर्तास ब्रेक लावला आहे. १० आॅक्टोबर रोजी भाजपावगळता अन्य सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेते, बीएमसीटी आणि जेएनपीटी यांच्यात होणाऱ्या बैठकीआधीच बीएमसीटीचे जनरल मॅनेजर शिवदास के. यांनी भविष्यात केली जाणारी नोकरभरती व्यवसायवाढीनंतर आणि जेएनपीटीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच केली जाईल, असे लेखी पत्रच देऊन नोकरभरतीच्या निर्णयाचा चेंडू जेएनपीटी प्रशासनाच्या कोर्टात टाकला आहे.जेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या बीएमसीटी प्रकल्पात वैद्यकीय मुलाखती झाल्यानंतरही १७ प्रकल्पग्रस्त मुलींना नोकरीत सामावून न घेतल्याच्या निषेधार्थ मागील तीन महिन्यांपासून जेएनपीटी, बीएमसीटीविरोधात भाजपावगळता सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन, निदर्शने, निषेध, आमरण उपोषण, गेट बंद, रास्ता रोको आदी आंदोलनांनी जेएनपीटीला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, जेएनपीटी प्रशासन बीएमसीटीनेही कागदी आणि पोकळ आश्वासनांची खैरात करीत प्रत्येकवेळी आंदोलनकर्त्यां प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. ३ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको करत भूमिपुत्रांनी जेएनपीटीचे कामकाज चार तास बंद पाडले होते. त्या वेळीही जेएनपीटीने १० आॅक्टोबर रोजी बैठकीचे आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले होते. मात्र, आंदोलन निर्णायक वळणावर असताना सर्वपक्षीय नेत्यांनी परस्पर निर्णयाने आंदोलन मागे घेतल्याने आंदोलकांमध्ये फूट पडली आहे.सध्या बीएमसीटीकडे २९८ कामगार काम करीत असून त्यापैकी १५१ प्रकल्पग्रस्त तर उरण तालुका, रायगड जिल्हा, नवी मुंबई आदी विभागातून ८३, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ६० कामगारांचा समावेश असल्याचे बीएमसीटीचे जनरल मॅनेजर शिवकुमार के. यांनी जेएनपीटीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बीएमसीटीमध्ये मासिक ३० ते ३५ हजार टीईयूएस इतक्याच कंटेनर मालाची आयात-निर्यात होत आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी