शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बीएमसीटी प्रशासनाचा नोकरभरतीसाठी ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:09 IST

जेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

उरण : जेएनपीटीच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदर प्रशासना (बीएमसीटी)ने १७ महिलांची नोकरभरती करण्यास तूर्तास ब्रेक लावला आहे. १० आॅक्टोबर रोजी भाजपावगळता अन्य सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेते, बीएमसीटी आणि जेएनपीटी यांच्यात होणाऱ्या बैठकीआधीच बीएमसीटीचे जनरल मॅनेजर शिवदास के. यांनी भविष्यात केली जाणारी नोकरभरती व्यवसायवाढीनंतर आणि जेएनपीटीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच केली जाईल, असे लेखी पत्रच देऊन नोकरभरतीच्या निर्णयाचा चेंडू जेएनपीटी प्रशासनाच्या कोर्टात टाकला आहे.जेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या बीएमसीटी प्रकल्पात वैद्यकीय मुलाखती झाल्यानंतरही १७ प्रकल्पग्रस्त मुलींना नोकरीत सामावून न घेतल्याच्या निषेधार्थ मागील तीन महिन्यांपासून जेएनपीटी, बीएमसीटीविरोधात भाजपावगळता सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन, निदर्शने, निषेध, आमरण उपोषण, गेट बंद, रास्ता रोको आदी आंदोलनांनी जेएनपीटीला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, जेएनपीटी प्रशासन बीएमसीटीनेही कागदी आणि पोकळ आश्वासनांची खैरात करीत प्रत्येकवेळी आंदोलनकर्त्यां प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. ३ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको करत भूमिपुत्रांनी जेएनपीटीचे कामकाज चार तास बंद पाडले होते. त्या वेळीही जेएनपीटीने १० आॅक्टोबर रोजी बैठकीचे आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले होते. मात्र, आंदोलन निर्णायक वळणावर असताना सर्वपक्षीय नेत्यांनी परस्पर निर्णयाने आंदोलन मागे घेतल्याने आंदोलकांमध्ये फूट पडली आहे.सध्या बीएमसीटीकडे २९८ कामगार काम करीत असून त्यापैकी १५१ प्रकल्पग्रस्त तर उरण तालुका, रायगड जिल्हा, नवी मुंबई आदी विभागातून ८३, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील ६० कामगारांचा समावेश असल्याचे बीएमसीटीचे जनरल मॅनेजर शिवकुमार के. यांनी जेएनपीटीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बीएमसीटीमध्ये मासिक ३० ते ३५ हजार टीईयूएस इतक्याच कंटेनर मालाची आयात-निर्यात होत आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी