शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

कर्जतमधील पूल धोकादायक !

By admin | Updated: April 11, 2016 01:30 IST

कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे

नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे, तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अशा पुलांवर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु याकडे बांधकाम खाते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निमाण झाली आहे.कर्जत तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्याअंतर्गत येत आहेत. परंतु या पुलाकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे लक्ष. त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, साळोख, वारे -कुरु ंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्यामोठ्या पुलांवर संरक्षक अद्याप बसविण्यात आले नाहीत. तसेच पुलावरील रस्तेही खराब झाल्याने अशा पुलांवरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.या पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते, परंतु पुलांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर असे नादुरु स्त पूल दुरु स्त करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर) >कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरील तुटलेल्या रेलिंगच्या संदर्भात दुरु स्ती प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल.- एस. एम. कांबळेउप अभियंता, सा. बां. विभाग, कर्जत