शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कर्जतमधील पूल धोकादायक !

By admin | Updated: April 11, 2016 01:30 IST

कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे

नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे, तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अशा पुलांवर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु याकडे बांधकाम खाते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निमाण झाली आहे.कर्जत तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्याअंतर्गत येत आहेत. परंतु या पुलाकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे लक्ष. त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, साळोख, वारे -कुरु ंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्यामोठ्या पुलांवर संरक्षक अद्याप बसविण्यात आले नाहीत. तसेच पुलावरील रस्तेही खराब झाल्याने अशा पुलांवरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.या पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते, परंतु पुलांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर असे नादुरु स्त पूल दुरु स्त करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर) >कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरील तुटलेल्या रेलिंगच्या संदर्भात दुरु स्ती प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल.- एस. एम. कांबळेउप अभियंता, सा. बां. विभाग, कर्जत