शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बोरावळे पूल धोकादायक : विद्यार्थी, ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:13 IST

पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात.

पोलादपूर : पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात. महाडची दुर्घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही. बोरावळे गावच्या हद्दीतील एका पुलाची (साकव) दुरवस्था झाली असून, त्या पुलाचा पायाच सरकला आहे. यामुळे येथे कधीही पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्रुपग्रामपंचायत बोरावळे हद्दीतील चाळीचाकोंड, बोरावळे गावठाण गुडेकरकोंड, मोरेवाडी, खोतवाडी, कोडबेकोंड या नागरिकांना साखर पितळवाडी व तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता कामथी नदीवर लोखंडी पूल (साकव) आहे. त्या पुलाचा पाया सरकला असून तो एका बाजूला तिरपा झाल्याचे स्थानिक ग्रामस्थाचे म्हणणे आहे.पुलाच्या सुरुवातीच्या भागात खालच्या बाजूने भगदाड पडल्याचे दिसते. हा पूल अनेक वर्षांपासून गंजलेला आहे. तो केव्हाही कालबाह्य होऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या आपत्तीस कारणीभूत ठरू शकतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून स्थानिक या पुलावरून प्रवास करतात. या पुलावरून माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये जवळजवळ २५ विद्यार्थी तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता व जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून आजही प्रवास करताना आपणास पाहावयास मिळत आहेत.ग्रामस्थांकडून वारंवार पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला असून शासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक यामुळे हवालदिल झाले असून, काही जणांचा जीव गेल्यावरच या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार का? असा संताप स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त के ला जात आहे.बोरावळे-साखर यांना जोडणारा हा पूल ३० ते ३५ वर्षांपासून असून, त्या वेळी पोलादपूर-बोरावळे रस्ता तसेच बोरजफाटा ते चाळीचाकोंड जोडरस्ता नसल्याने सर्व ये-जा याच पुलावरून व्हायची. मात्र, आता नवीन मार्ग झाले, त्यामुळे प्रत्येक वाडी-वस्तीवर वाहने पोहोचली. मात्र, अजूनही काही लोक असे आहेत की, त्यांना वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने व सर्वात सोयीचा पर्याय म्हणून याच पुलावरून जाणे भाग पडते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुलाची अवस्था पाहता पालकांनासुद्धा आपली मुले घरी आल्याशिवाय चैन पडत नाही.