शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

बोरावळे पूल धोकादायक : विद्यार्थी, ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:13 IST

पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात.

पोलादपूर : पोलादपूर तालुका हा भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम व डोंगराळ भाग असून तालुक्याच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळे, पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असतात. महाडची दुर्घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही. बोरावळे गावच्या हद्दीतील एका पुलाची (साकव) दुरवस्था झाली असून, त्या पुलाचा पायाच सरकला आहे. यामुळे येथे कधीही पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्रुपग्रामपंचायत बोरावळे हद्दीतील चाळीचाकोंड, बोरावळे गावठाण गुडेकरकोंड, मोरेवाडी, खोतवाडी, कोडबेकोंड या नागरिकांना साखर पितळवाडी व तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता कामथी नदीवर लोखंडी पूल (साकव) आहे. त्या पुलाचा पाया सरकला असून तो एका बाजूला तिरपा झाल्याचे स्थानिक ग्रामस्थाचे म्हणणे आहे.पुलाच्या सुरुवातीच्या भागात खालच्या बाजूने भगदाड पडल्याचे दिसते. हा पूल अनेक वर्षांपासून गंजलेला आहे. तो केव्हाही कालबाह्य होऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या आपत्तीस कारणीभूत ठरू शकतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून स्थानिक या पुलावरून प्रवास करतात. या पुलावरून माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये जवळजवळ २५ विद्यार्थी तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता व जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून आजही प्रवास करताना आपणास पाहावयास मिळत आहेत.ग्रामस्थांकडून वारंवार पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला असून शासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक यामुळे हवालदिल झाले असून, काही जणांचा जीव गेल्यावरच या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार का? असा संताप स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त के ला जात आहे.बोरावळे-साखर यांना जोडणारा हा पूल ३० ते ३५ वर्षांपासून असून, त्या वेळी पोलादपूर-बोरावळे रस्ता तसेच बोरजफाटा ते चाळीचाकोंड जोडरस्ता नसल्याने सर्व ये-जा याच पुलावरून व्हायची. मात्र, आता नवीन मार्ग झाले, त्यामुळे प्रत्येक वाडी-वस्तीवर वाहने पोहोचली. मात्र, अजूनही काही लोक असे आहेत की, त्यांना वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने व सर्वात सोयीचा पर्याय म्हणून याच पुलावरून जाणे भाग पडते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुलाची अवस्था पाहता पालकांनासुद्धा आपली मुले घरी आल्याशिवाय चैन पडत नाही.