शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

रायगडमधील ११० शाळांत बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:06 IST

राज्यात २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील १४०४ शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला.

- आविष्कार देसाई अलिबाग : राज्यात २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील १४०४ शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला. त्या वेळी या कारवाईमध्ये रायगडमधील ११० शाळांमध्ये बोगस विद्यार्थी असल्याचा अहवाल देण्यात आला होता. पैकी पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक आणि गुरू लिंगेश्वर प्राथमिक शाळेने पटसंख्या वाढवल्याचे समोर आले होते. तपासणीमध्ये शिक्षण विभागाला आता खासगी शाळेमध्ये सर्वच अलबेल असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्या शाळेवर सध्या गुन्हा दाखल करण्याची गरज नसल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हा परिषदेच्या ११० शाळांनी प्रथमदर्शनी चुकीचे धोरण अवलंबल्याचे समोर आले होते. त्यापैकी बºयाचशा शाळा आता बंद झालेल्या आहेत. पटपडताळणीध्ये दोषी आढळलेल्या आता फक्त दोन शाळा आहेत, त्यापैकी पनवेल तालुक्यातील चांदणेवाडी जिल्हा परिषद शाळा आणि पनवेल तालुक्यातीलच गुरू लिंगेश्वर प्राथमिक शाळेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर कारवाईबाबत सरकारकडून अद्याप निर्देश आलेले नाहीत, तर गुरू लिंगेश्वर प्राथमिक शाळेतील व्यवहारांची तपासणी गेले दोन दिवस सुरू आहे, त्यामध्ये शिक्षण विभागाला अद्याप आक्षेपार्ह आढळलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षण विभागाने ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविली होती. त्यात अनेक संस्थांनी गैरप्रकार केल्याची चर्चा सुरू होती. अनेक दिवस थंड बस्त्यात गेलेला हा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल होऊन, या प्रकरणात खंडपीठाने शाळांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिल्यानंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. शाळेतील पटसंख्या बोगस दाखविल्याप्रकरणी राज्यातील दोषी शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, कर्मचारी यांच्या विरोधात दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी काढलेहोते.राज्यात काही वर्षांपूर्वी बोगस विद्यार्थी पटावर दाखवून सरकारची दिशाभूल करणे, बोगस पटसंख्येच्या आधारावर तुकडी वाढवून मागणे, वाढीव तुकडींवर अतिरिक्त शिक्षकांची मागणी करणे, अशा प्रकारची कामे शाळांच्या प्रशासनाने केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये पटपडताळणी मोहीम राबविली होती.मोहिमेमध्ये शाळांमध्ये बोगस पटसंख्या असल्याचे आढळून आले होते. या बोगस पटसंख्यांच्या आधारे शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आदी लाभ शाळा प्रशासनाने मिळविल्याचे तपासणीत पुढे आले होते.> विभागाचा कारभारावर प्रश्नचिन्हपनवेल तालुक्यातील गुरू लिंगेश्वर प्राथमिक शाळेवर सध्या तरी गुन्हा दाखल करण्याची गरज नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे आधी गडबड वाटणाºया शाळेबाबत आता नेमके असे काय घडले आहे की, त्यांच्या कारभारात सर्वच अलबेल असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिसून आले. शिक्षण विभागाच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.>केवळ कागदोपत्री कारवाई झाल्याने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात खंडपीठाने शाळांवर फौजदारी करण्याचे आदेश दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान म्हणून खंडपीठाने शालेय शिक्षण विभागावर ताशेरे ओढून शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Raigadरायगड