शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होड्या समुद्रात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:09 IST

अनेक संकटांनंतर मच्छीमारांना चांगले दिवस येण्याची शक्यता

आगरदांडा : कोकणाला लाभलेल्या ७२० सागरी किनाऱ्यावर सुमारे पाच लाख मच्छीमार समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यंदाचे वर्ष मच्छीमारांना अनेक संकटांवर मात करून मोठ्या कठीण परिस्थितीवर मात करून काढावे लागले आहेत. मात्र, १ आॅगस्टपासून यांत्रिकी बोटी पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या असून, नवीन सुरू होणाºया या हंगामात काहीतरी आपली आर्थिक परिस्थती सुधारेल, अशी आशा येथे व्यक्त करण्यात येत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, मजगाव, नांदगाव आदी ठिकाणी ६५० यांत्रिकी बोटी असून, नव्या हंगामाची ते सुरुवात करणार आहेत. १ आॅगस्टपूर्वीच मच्छीमारांनी आपल्या मोठ्या होड्यांची दुरुस्ती, कलर, मशीनचे काम पूर्ण केले होते. आता मोठ्या होड्यांमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, बर्फ, मसाले असा रोजच्या भोजनासाठी लागणारा सर्व किराणा माल भरून मोठ्या होड्या खोल समुद्रात आठ दिवस मासळी पकडण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे १ आॅगस्टपासून सुरुवात होणाºया या हंगामात मासे कसे मिळतात, यावरच त्यांचे जीवनमान अवलंबून राहणार आहे.मुरुड तालुक्यातील सर्व होड्या शनिवारपासून हळूहळू रवाना होत आहेत. शासनाने मुंबईमधील मोठे मासळी मार्केट उघडणे खूप आवश्यक असल्याचे मत अनेक मच्छीमार लोकांनी व्यक्त केले आहे. कारण खोल समुद्रात पकडलेली मासळी विकण्यासाठी मार्केट मिळणे खूप गरजेचे व महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मच्छीमारीची प्रथमच सुरुवात होत असून, मोठ्या उत्साहात बोटी रवाना झाल्या आहेत.समुद्रात मासे पकडण्यासाठी एका होडीला ६० ते ७० हजार रुपये खर्च होतो. स्थानिक मार्केटला भाव मिळत नसल्याने साधा डिझेलचा ही खर्च निघत नाही. तरी शासनाने आम्हाला मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठा मासळी बाजार उपलब्ध करू दिला पाहिजे आणि लॉकाडाऊन पूर्णता बंद केले पाहिजे, तरच कोळीबांधव सावरेल.- दशरथ मकु, मच्छीमार

टॅग्स :Raigadरायगड