शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होड्या समुद्रात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:09 IST

अनेक संकटांनंतर मच्छीमारांना चांगले दिवस येण्याची शक्यता

आगरदांडा : कोकणाला लाभलेल्या ७२० सागरी किनाऱ्यावर सुमारे पाच लाख मच्छीमार समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यंदाचे वर्ष मच्छीमारांना अनेक संकटांवर मात करून मोठ्या कठीण परिस्थितीवर मात करून काढावे लागले आहेत. मात्र, १ आॅगस्टपासून यांत्रिकी बोटी पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या असून, नवीन सुरू होणाºया या हंगामात काहीतरी आपली आर्थिक परिस्थती सुधारेल, अशी आशा येथे व्यक्त करण्यात येत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, मजगाव, नांदगाव आदी ठिकाणी ६५० यांत्रिकी बोटी असून, नव्या हंगामाची ते सुरुवात करणार आहेत. १ आॅगस्टपूर्वीच मच्छीमारांनी आपल्या मोठ्या होड्यांची दुरुस्ती, कलर, मशीनचे काम पूर्ण केले होते. आता मोठ्या होड्यांमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, बर्फ, मसाले असा रोजच्या भोजनासाठी लागणारा सर्व किराणा माल भरून मोठ्या होड्या खोल समुद्रात आठ दिवस मासळी पकडण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे १ आॅगस्टपासून सुरुवात होणाºया या हंगामात मासे कसे मिळतात, यावरच त्यांचे जीवनमान अवलंबून राहणार आहे.मुरुड तालुक्यातील सर्व होड्या शनिवारपासून हळूहळू रवाना होत आहेत. शासनाने मुंबईमधील मोठे मासळी मार्केट उघडणे खूप आवश्यक असल्याचे मत अनेक मच्छीमार लोकांनी व्यक्त केले आहे. कारण खोल समुद्रात पकडलेली मासळी विकण्यासाठी मार्केट मिळणे खूप गरजेचे व महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मच्छीमारीची प्रथमच सुरुवात होत असून, मोठ्या उत्साहात बोटी रवाना झाल्या आहेत.समुद्रात मासे पकडण्यासाठी एका होडीला ६० ते ७० हजार रुपये खर्च होतो. स्थानिक मार्केटला भाव मिळत नसल्याने साधा डिझेलचा ही खर्च निघत नाही. तरी शासनाने आम्हाला मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठा मासळी बाजार उपलब्ध करू दिला पाहिजे आणि लॉकाडाऊन पूर्णता बंद केले पाहिजे, तरच कोळीबांधव सावरेल.- दशरथ मकु, मच्छीमार

टॅग्स :Raigadरायगड