शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होड्या समुद्रात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:09 IST

अनेक संकटांनंतर मच्छीमारांना चांगले दिवस येण्याची शक्यता

आगरदांडा : कोकणाला लाभलेल्या ७२० सागरी किनाऱ्यावर सुमारे पाच लाख मच्छीमार समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यंदाचे वर्ष मच्छीमारांना अनेक संकटांवर मात करून मोठ्या कठीण परिस्थितीवर मात करून काढावे लागले आहेत. मात्र, १ आॅगस्टपासून यांत्रिकी बोटी पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या असून, नवीन सुरू होणाºया या हंगामात काहीतरी आपली आर्थिक परिस्थती सुधारेल, अशी आशा येथे व्यक्त करण्यात येत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, मजगाव, नांदगाव आदी ठिकाणी ६५० यांत्रिकी बोटी असून, नव्या हंगामाची ते सुरुवात करणार आहेत. १ आॅगस्टपूर्वीच मच्छीमारांनी आपल्या मोठ्या होड्यांची दुरुस्ती, कलर, मशीनचे काम पूर्ण केले होते. आता मोठ्या होड्यांमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, बर्फ, मसाले असा रोजच्या भोजनासाठी लागणारा सर्व किराणा माल भरून मोठ्या होड्या खोल समुद्रात आठ दिवस मासळी पकडण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे १ आॅगस्टपासून सुरुवात होणाºया या हंगामात मासे कसे मिळतात, यावरच त्यांचे जीवनमान अवलंबून राहणार आहे.मुरुड तालुक्यातील सर्व होड्या शनिवारपासून हळूहळू रवाना होत आहेत. शासनाने मुंबईमधील मोठे मासळी मार्केट उघडणे खूप आवश्यक असल्याचे मत अनेक मच्छीमार लोकांनी व्यक्त केले आहे. कारण खोल समुद्रात पकडलेली मासळी विकण्यासाठी मार्केट मिळणे खूप गरजेचे व महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मच्छीमारीची प्रथमच सुरुवात होत असून, मोठ्या उत्साहात बोटी रवाना झाल्या आहेत.समुद्रात मासे पकडण्यासाठी एका होडीला ६० ते ७० हजार रुपये खर्च होतो. स्थानिक मार्केटला भाव मिळत नसल्याने साधा डिझेलचा ही खर्च निघत नाही. तरी शासनाने आम्हाला मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठा मासळी बाजार उपलब्ध करू दिला पाहिजे आणि लॉकाडाऊन पूर्णता बंद केले पाहिजे, तरच कोळीबांधव सावरेल.- दशरथ मकु, मच्छीमार

टॅग्स :Raigadरायगड