शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मुरुड किनाऱ्यावरील बोटी निघाल्या खोल समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:07 IST

कोळी बांधवांमध्ये उत्साह : चंद्रप्रकाश ओसरल्याने मासेमारीची लगबग सुरू

मुरुड : अवकाळी पाऊस व तद्नंतर वेगवेगळी वादळे यामुळे वाºयाचा वेग वाढला व ऐन हंगामात होड्या सागरीकिनाºयाला लागलेल्या. आॅगस्टपासून ते आजतागायत समुद्रात कधी वाºयाचे प्रमाण वाढले तर ढगाळ हवामानामुळे कोकण किनारपट्टीवरील समस्त कोळी समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. अनेक संकटांचा सामना करत मच्छीमारी करणारा कोळी समाज धैर्याने तोंड देत असून, ज्या वेळी परिस्थिती निवळत आहे तेव्हा ते मोठ्या आनंदाने खोल समुद्रात जाण्यास तयार होत आहेत.

७ डिसेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत चांदणी रात्र व प्रखर चंद्रप्रकाश पडत असल्यामुळे जाळ्यामध्ये मासे मिळत नाहीत. या दिवसात मासेमारीला जाऊनसुद्धा भरसमुद्रात चंद्राचा व ताऱ्यांचा प्रखर प्रकाश पडत असल्याने मासे जाळ्यात फसत नाहीत. त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या होड्या किनाºयावर परतल्या होत्या. १५ डिसेंबरपासून काळोख्या रात्रीस सुरुवात होईल व किनाºयाला आलेल्या होड्या पुन्हा समुद्रात जाण्यास सज्ज झाल्या आहेत. रविवार, १५ डिसेंबरपासून चंद्र व ताºयांचा प्रकाश ओसरणार असून, काळोख्या रात्रीची सुरुवात होणार आहे. मुरुड येथील एकदरा पुलाखाली असंख्य उभ्या असणाºया होड्यांची रेलचेल रविवारपासून सुरू झाली आहे. सहा सिलिंडरच्या असणाºया मोठ्या बोटीच्या डागडुजीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या बोटींवर खोल समुद्रात मासेमारी करीत असताना किमान आठ दिवस राहावे लागते, यासाठी मिळालेली मासळी ताजी व फ्रेश राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ भरण्यात येत आहे. महिनाभर पुरेल एवढे धान्य व अन्य बाबी बोटीवर भरण्यात मच्छीमार व्यस्त आहेत.मोठ्या बोटींची कामे पूर्ण; खलाशी झाले सज्जच्येणाºया एक अथवा दोन दिवसांत किनाºयाला आलेल्या सर्व मोठ्या बोटी मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातील, त्या वेळी सागरीकिनाºयावर एकही बोट दिसणार नाही.च्सर्व मोठ्या बोटींची कामे पूर्ण झाली असून, रविवारपासून खोल समुद्रात बोटी रवाना होण्यास सज्ज झाल्या आहेत. यासाठी बोटीवर बर्फ , रॉकेल, डिझेल अशा गोष्टी पूर्ण करण्यात येत असून खलाशांनी खोल समुद्रात जाण्यासाठी तयार होण्याचे आदेश बोटमालकांकडून देण्यात आले आहेत.च्समुद्रात काळोख पसरल्याने मासळी जाळ्यात अडकणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून विविध संकटांना सामोरे जाणारे मच्छीमार पुन्हा नव्या उमेदीने मासेमारी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संकटाचा काळ संपून मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन झालेले कर्ज फिटून धंद्यात फायदा मिळावा, हीच प्रार्थना समस्त कोळी समाज करत आहे.