शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

मुरुडमध्ये पावसामुळे बोटी किनाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:31 IST

मच्छीमारांना आर्थिक फटका; मासेमारीला गेलेल्या बोटी परतल्या 

लोकमत न्यूज नेटवर्क मुरुड : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी पहाटेपासून मुरुड तालुक्यात पावसाची सुरुवात झाली. किमान चार तास पाऊस पडल्याने सर्वत्र धुके पसरले होते. पाऊस जरी रिमझिम बरसत असला तरी याचा मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही बोटी किनाऱ्याला शाकारल्या होत्या. परंतु बहुतांश बोटी या खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या. खोल समुद्रात वारा व पावसाचे प्रमाण वाढताच सर्व बोटींनी किनारा गाठला आहे. आगरदांडा बंदर, राजपुरी बंदर व खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.

खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीवर सामान भरण्यासाठी किमान ८० हजार रुपयांपर्यंत खर्च होत असतो. आठ दिवसांचे सामान, सर्व जीवनावश्यक वस्तू भरण्यात येतात. परंतु अचानक अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मिळालेली मासळी घेऊन सर्व बोटी सुरक्षित किनाऱ्याला आल्या आहेत. या वेळी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बोट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी अवकाळी पावसाचा जोर खोल समुद्रात जास्त होता तसेच दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते, कसाबसा आम्ही किनारा गाठला आहे, असे सांगितले.

सर्व बोटींवर अल्प मासळी मिळाल्यामुळे त्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. मासळी बाजारात मासळी आली, परंतु मासळीचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात लिलाव करताना चढ्या भावाने लिलाव घ्यावा लागल्याने मासळी बाजारातसुद्धा मासळीचे दर वाढले होते. सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस हा कोकणातील मच्छीमारांची डोकेदुखी ठरत आहे. शासनाची कोणतीही मदत मिळत नसतानासुद्धा मच्छीमार आपल्या जीवनाचा गाडा हाकत आहेत.

मच्छीमारी करणे कठीण होत आहे - मनोहर बैलेयाबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. एका बोटीला खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी किमान ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो त्यामध्ये फक्त १५ ते २० हजार रुपयांची मासळी मिळते. प्रत्येक ट्रिपला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे मच्छीमारी करणे खूप कठीण होत आहे असे सांगितले. अशीच परस्थिती राहिली तर मच्छीमार कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाकडून मिळणारी डिझेल परताव्याची रक्कम २०१८ पासून ते आजतागायत मिळालेली नाही, अशी खंत बैले यांनी व्यक्त केली.