शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुरुडमध्ये बोटधारकांचे कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:33 IST

४०० लोकांची मर्यादा ठेवल्याने संताप; जंजिरा किल्ला बंदच राहिल्याने हजारो पर्यटकांची निराशा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वेय ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा २५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. ३ जानेवारीपासून सर्व जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, पुरातत्त्व खात्याकडून दिवसाला ४०० पर्यटकच किल्ल्यात नेले जातील, असा नियम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जलवाहतूक करणाऱ्या सर्व सहकारी सोसायट्यांची नाराजी व्यक्त केली आहे, तर बोटधारकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी पाच सहकारी सोसायट्या असून, प्रत्येक सोसायटीला फक्त ८० पर्यटक नेता येणार असल्याने सर्व बोट मालक व चालकांनी एकत्र येत, जल वाहतूक बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे. किल्ल्यावरील जल वाहतूक बंद ठेवल्याने हजारो पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागले आहे. रविवारची सुट्टी साधून कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, बोरीवली, भिवंडी आदी भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते, परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना हा किल्ला पाहाता आला नाही. यावेळी जल वाहतूक करणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४०० संख्येचा निर्बंध रद्द करा, अशी घोषणा करीत, आंदोलनाचा झेंडा फडकवला आहे. बोट मालकांनी आंदोलन पुकारल्याने जंजिरा किल्ला आता किती दिवस बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोजगाराचा प्रश्न बनला गंभीरमहालक्ष्मी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गीदी यांनी संचारबंदीच्या काळात लोक घरात बसून राहिल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध आल्याने आमचे लोक बेकारीचे जीवन जगणार आहेत, असे सांगितले. जंजिरा किल्ल्याचे संरक्षक गोगरे यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या जल वाहतूक सोसायट्यांचे ४०० पर्यटक संख्येवर आक्षेप असल्याने, किल्ला बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.

किल्ला पाहाण्यासाठी महाराष्ट्रातून खूप दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रोज नवीन नियम लादल्यामुळे पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागल्याने पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काशीद समुद्र किनारी व अन्य समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु तिथे निर्बंध नाहीत, मग जंजिरा किल्ल्यावर निर्बंध का?-हिरकणी गीदी, सरपंच, राजपुरी ग्रामपंचायत

जल वाहतुकीद्वारे सेवा देताना आमचे ११० कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत असतात. संख्येवर निर्बंध ठेवल्याने आमच्या रोजी रोटीचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांचा आदेश २ जानेवारीपर्यंत असताना, ४०० लोकांची मर्यादा पुढे सुरू ठेवणे हे योग्य नाही.-इस्माईल आदमने, चेअरमन, जंजिरा पर्यटक सहकारी सोसायटी

टॅग्स :fishermanमच्छीमार