शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जासई, दिघोडे चिरनेर, न्हावा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडी विरोधात भाजपा लढाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2023 20:45 IST

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर, न्हावा आदी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडी विरोधात भाजप असाच सामना रंगणार आहे.सत्ता स्थापनेसाठी मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.मात्र सर्वच उमेदवारांचे निवडणुकीतील भविष्य मतदारांच्या होणाऱ्या मतदानावरच अवलंबून आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार आहे. सरपंचासह १७ जागांसाठी पाच प्रभागातुन ३० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.पाच प्रभागाची एकूण मतदार संख्या ४८४० आहे.प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे.हाच निवडणूकीत प्रचाराचा  प्रमुख मुद्दा बनला असून भाजपला डोकेदुखी ठरू लागला आहे.मात्र दोन्हीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप विरोधात कॉंग्रेस, शेकाप आघाडी अशीच लढत होणार आहे. मागील निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता स्थापन केली होती.मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता भाजपच्या सत्ताधाऱ्यांना करता आली नसल्याचा आरोप कॉंग्रेस -शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर यांनी केला आहे.तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीत ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या ९ तर थेट सरपंचपद अशा १० जागांसाठी निवडणूक होत आहे.विशेष म्हणजे सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.तर सदस्यांच्या ९ जागांसाठी तीन प्रभागातून एकूण १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.या ग्रामपंचायतींमध्ये एकूण मतदारांची संख्या २१७७ आहे.

जासई लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव.या ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी लढाई आहे.सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची थेट सरपंच आणि १७ अशी १८ सदस्य संख्या आहे.यामधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे उर्वरित १६ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.या मतदार संघात ४१८२ मतदार आहेत.आंदोलनाचे जासई प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.संघर्षाचा इतिहास असलेल्या जासई ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी लढाई आहे.मात्र नवख्या उमेदवारांवर मतदार कितपत विश्वास टाकतात यावरच भाजपचे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

न्हावा ग्रामपंचायतीमध्ये भाजप-कॉग्रेस आघाडीच्या विरोधात भाजप प्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा -न्हावाखाडी पॅनेल अशी अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.या ग्रामपंचायतीत थेट सरपंच आणि ९ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.सरपंचासाठी दोन तर ९ सदस्यपदासाठी १८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.या ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागाची मतदार संख्या ३२३२ आहे.जागा वाटपात एकमत झाले नसल्याने कॉंग्रेसने महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपशी सोयरिक साधली आहे.त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे.त्यातच निवडणूकी दरम्यान दोन्ही गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन्ही गटातील कार्यकर्ते रक्तबंबाळ झाल्याने तणावाच्या वातावरणात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीत विजयी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली,सभा घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडविला आहे.मतदारांना आमिषे दाखवून आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले आहेत.मात्र सुजाण, सुशिक्षित मतदार कुणाला मतदान करतात या वरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मतदानाकडे सर्वाचेच लक्ष लागून राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत