शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 23:56 IST

अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत; निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे ग्रामस्थांची चिंता वाढली

 लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग आल्याने अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव भावे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.काळ नदीपात्रावर खरवली बिरवाडी गावांना जोडून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून काळ नदीपात्रातील पाणी अडविण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा काळ नदीपात्रामध्ये जमा होतो. मात्र, यावर्षी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग चढला असल्याने पाणी दूषित होऊन झाले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारी निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.  काळ नदीपात्राच्या बाजूला वसलेल्या खरवली, काळीज, बिरवाडी या गावांमधील सांडपाणी काळ नदीपात्रात मिसळते. त्यासोबतच अतिरिक्त एमआयडीसीमधील कारखान्यांचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने  नदीच्या  पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्याने धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

काळ नदीपात्रामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, दरवर्षी काळ नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत असल्याने मोहोत, निगडे, भावे ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याबाबत अनेकवेळा संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय अधिकारी यांच्याजवळ पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच रामचंद्र निकम यांनी दिला आहे.