शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 23:56 IST

अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत; निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे ग्रामस्थांची चिंता वाढली

 लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग आल्याने अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव भावे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.काळ नदीपात्रावर खरवली बिरवाडी गावांना जोडून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून काळ नदीपात्रातील पाणी अडविण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा काळ नदीपात्रामध्ये जमा होतो. मात्र, यावर्षी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग चढला असल्याने पाणी दूषित होऊन झाले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारी निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.  काळ नदीपात्राच्या बाजूला वसलेल्या खरवली, काळीज, बिरवाडी या गावांमधील सांडपाणी काळ नदीपात्रात मिसळते. त्यासोबतच अतिरिक्त एमआयडीसीमधील कारखान्यांचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने  नदीच्या  पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्याने धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

काळ नदीपात्रामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, दरवर्षी काळ नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत असल्याने मोहोत, निगडे, भावे ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याबाबत अनेकवेळा संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय अधिकारी यांच्याजवळ पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच रामचंद्र निकम यांनी दिला आहे.