शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

महाड एसटी आगाराला कोट्यवधींचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:24 IST

चार महिन्यांपासून वाहतूक ठप्प : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन सेवा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, संपूर्ण देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार गेल्या चार महिन्यांपासून ठप्प झाले आहेत. महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी समजली जाणारी राज्य परिवहन सेवाही बंद करण्यात आली. महाड आगारातून दर दिवशी चारशेपेक्षा अधिक एसटीच्या फेऱ्या मारल्या जात होत्या, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून एकही एसटी बस रस्त्यावर धावू शकली नाही. यामुळे एकट्या महाड आगराचे चार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे एसटी बसस्थानक म्हणून महाड स्थानकाला महत्त्व आहे. कोकणामध्ये जाणारी प्रत्येक बस या बसस्थानकावर थांबविण्यात येते.शिवाय महाड शहर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळे असल्याने प्रतिदिन शेकडो पर्यटक एसटीने महाडला ये-जा करत असतात. दर दिवशी महाड आगारात चारशेपेक्षा अधिक बसेस मुंबई, गोवा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जातात. त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासामध्यही महाड बसस्थानकावर थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या एप्रिल महिन्यापासून एसटीच्या सर्व फेºया बंद आहेत.एसटी बसेस महाड आगारात एकाच जागेवर उभ्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या महाड स्थानकावरून गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या संचारबंदीच्या काळामध्ये एकही बस रस्त्यावर धावली नाही. या आगारातून दरदिवशी लांब आणि स्थानिक पल्ल्याच्या ३४७ फेºया मारल्या जातात. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, बोरीवली, पुणे, नाशिक, जळगाव, अक्कलकोट आदी लांब पल्ल्याच्या बसेस या बसस्थानकावरून सोडण्यात येत असल्याने, या स्थानकाचे उत्पन्न महिन्याला दोन कोटींपेक्षा अधिक होते.शिवाय शैक्षणिक सहली, लग्न सोहळे आदींसाठीही एसटीच्या बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात होत्या. यातूनही महामंडळाला नफा मिळत होता. मात्र, ऐन सुट्टीच्या आणि लग्नसराईतच कोरोनामुळे संचारबंदी लागल्याने एसटीचे फार मोठे नुकसान झाले आहे.एसटीला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने चिंता१एप्रिल मे महिन्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. त्याचप्रमाणे, लग्नसराईमुळेही एसटीचे उत्पन्न वाढते, परंतु लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद करण्यात आल्याने, महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांनंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये एसटी धावण्यास सुरुवात झाली आहे.२करण्यात आलेली असली, तरी प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, एसटीचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एसटी बसेसमध्ये प्रवासी बसण्यास अद्याप तयार नाहीत, यामुळे महाड, पनवेल आणि माणगाव अशा फेºया संचारबंदी शिथिल केल्यानंतर सुरू करण्यात आल्या.३ मात्र, याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यातच पुन्हा संचारबंदी लागल्याने, आता तर एसटी बसेस सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून, हा तोटा लवकर भरून येणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.