शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

कोट्यवधींचा राज्यमार्ग खड्ड्यांत, कर्जत-कल्याण मार्गाचे काम निकृष्ट, मलमपट्टीच्या नावे लाखोंच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:35 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्ग खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे;

- कांता हाबळे ।नेरळ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्र्गे खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे; परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, वारंवार मलमट्टी करावी लागत आहे. या मलमट्टीसाठीही लाखो रु पयांचे टेंडर काढले जात आहेत. मात्र, रस्त्याची अवस्था जैसे थे असून, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाºयांची आर्थिक स्थिती मात्र नक्कीच सुधारत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.राज्यमार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिक आमदार सुरेश लाड यांनीही विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून प्रश्न उपस्थित केला होता; परंतु तरीसुद्धा राज्यमार्गाच्या कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. प्रसार माध्यमांकडूनही राजमार्गाच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच आवाज उठविण्यात आला आहे; परंतु संंबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हितसंबंधांमुळे हा आवाज दडपला जात आहे. फारच विरोध झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांवर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात येते. कर्जत-पळसदरी मार्गावर वर्दळ वाढली असून, बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने चालक हैराण झाले आहेत.अवघ्या काही दिवसांपूर्वी याच मार्गावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने, तसेच खड्डे चुकविताना दुचाकीचा अपघात झाला होता. यात एका प्रवाशाला जीवही गमवावा लागला आहे. तरीसुद्धा संबंधित प्रशासन अािण लोकप्रतिनिधी याबाबत फारसे गंभीर नसल्यानेच नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूतकर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरवस्थेला संबंधित ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.त्यामुळे अशा ठेकेदार आणि अधिकाºयांच्या हितसंबंधांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत; परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न चालकांसह स्थानिकांनाही पडला आहे.दर्जेदार काम महत्त्वाचेकर्जत-मुरबाड राज्यमार्गाचे रुंदीकरणही तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने या राज्यमार्गाचे काम चांगल्या दर्जाने केल्याने तीन पावसाळे उलटूनही आजही हा राज्यमार्ग सुस्थितीत आहे. मात्र, कल्याण-कर्जत-पळसदरी-खोपोली राज्यमार्ग अतिपावसामुळे खड्डेमय झाला आहे.