शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कोट्यवधींचा राज्यमार्ग खड्ड्यांत, कर्जत-कल्याण मार्गाचे काम निकृष्ट, मलमपट्टीच्या नावे लाखोंच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:35 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्ग खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे;

- कांता हाबळे ।नेरळ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्र्गे खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे; परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, वारंवार मलमट्टी करावी लागत आहे. या मलमट्टीसाठीही लाखो रु पयांचे टेंडर काढले जात आहेत. मात्र, रस्त्याची अवस्था जैसे थे असून, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाºयांची आर्थिक स्थिती मात्र नक्कीच सुधारत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.राज्यमार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिक आमदार सुरेश लाड यांनीही विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून प्रश्न उपस्थित केला होता; परंतु तरीसुद्धा राज्यमार्गाच्या कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. प्रसार माध्यमांकडूनही राजमार्गाच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच आवाज उठविण्यात आला आहे; परंतु संंबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हितसंबंधांमुळे हा आवाज दडपला जात आहे. फारच विरोध झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांवर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात येते. कर्जत-पळसदरी मार्गावर वर्दळ वाढली असून, बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने चालक हैराण झाले आहेत.अवघ्या काही दिवसांपूर्वी याच मार्गावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने, तसेच खड्डे चुकविताना दुचाकीचा अपघात झाला होता. यात एका प्रवाशाला जीवही गमवावा लागला आहे. तरीसुद्धा संबंधित प्रशासन अािण लोकप्रतिनिधी याबाबत फारसे गंभीर नसल्यानेच नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूतकर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरवस्थेला संबंधित ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.त्यामुळे अशा ठेकेदार आणि अधिकाºयांच्या हितसंबंधांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत; परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न चालकांसह स्थानिकांनाही पडला आहे.दर्जेदार काम महत्त्वाचेकर्जत-मुरबाड राज्यमार्गाचे रुंदीकरणही तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने या राज्यमार्गाचे काम चांगल्या दर्जाने केल्याने तीन पावसाळे उलटूनही आजही हा राज्यमार्ग सुस्थितीत आहे. मात्र, कल्याण-कर्जत-पळसदरी-खोपोली राज्यमार्ग अतिपावसामुळे खड्डेमय झाला आहे.