शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाताला १,४६० रुपये हमीभाव

By admin | Updated: October 10, 2015 23:54 IST

खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये

पेण : खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये सुधारित आधारभूत किंमत २०१५-१६ या वर्षासाठी जाहीर केल्या आहेत. गतवर्षीच्या आधारभूत किमतीमध्ये ५० रुपये वाढ केली आहे. या वर्षीचा खरीप हंगाम रायगडात समाधानकारक नसून, उत्तर दक्षिण रायगडात शेतीचे चित्र समाधानकारक आहे. सध्या आघाडीची परिपक्व झालेली पिकांची कापणी व झोडणी सुरू असून, परतीचा बेभरवशाचा पावसामुळे कापणी व मळणी एकाच वेळी उरकण्यावर शेतकरी बांधवांचा भर आहे.नवरात्रोत्सवाची घटस्थापना होताक्षणी कापणीचा हंगाम भात शिवारात जोर धरू लागेल. गतवर्षी खरिपात उत्पादित झालेल्या भात हमी खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांना कमी भावात दालालांना विकावा लागला. गतवर्षी ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,३६० रुपये आधारभूत हमीभाव शासनाने जाहीर केला होता. मात्र भातखरेदी केंद्रच सुरू न केल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. १,००० ते ११,००० रुपये प्रतिक्विंटलने शेतकऱ्यांनी दलालांना भात विकला. वर्षभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना या पद्धतीने नुकसान होऊनदेखील रायगड व कोकणपट्ट्यातील शेतकरी आपल्या पायावर सक्षमपणे उभा आहे.यावर्षी आधारभूत किमतीमध्ये ५० रुपयांची भर टाकून १,४५० रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली असताना शेतकरी यावर समाधानी नाही. बियाणे, खते, मजुरी, किटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती व उत्पादित होणाऱ्या शेतमालाला उत्पादनावर आधारित आधारभूत किंमत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी फेडरेशनला कृषी व पणन मंडळाने लवकरात लवकर आदेश पारित करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कृषी उत्पादित माल या खरेदी केंद्रावर नेता येईल. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतीत अधिक लक्ष द्यावे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. (वार्ताहर)