शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

भाल, विठ्ठलवाडी पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 5, 2015 23:56 IST

भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील

पेण : भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात येवून अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वितरण सुरळीत करण्याबाबत जाब विचारला. मात्र ग्रामपंचायत शिष्टमंडळ कार्यालयात आले तेव्हा जबाबदार अधिकारीच गैरहजर राहिल्याने सदस्यांसह सरपंच नलिनी म्हात्रे व उपसरपंच रमाकांत म्हात्रे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.पेणच्या विठ्ठलवाडी व मोठे भाल गावाची पिण्याच्या पाण्यासाठी दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात पाऊस पडल्याने पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांनी तहान भागविली. आता पाऊस गेल्यानंतर पिण्याचे पाणी कुठून आणणार? यासाठी वढाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार करुन देखील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी डी.एन. खैरे व शाखा अभियंता मुसळे यांनी या गावांच्या पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या जलवाहिन्यांकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली आहे. काही दिवस पाणीपुरवठा न झाल्यास पुन्हा एकदा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.एप्रिलमध्ये ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी शासकीय प्रांत अधिकारी निधी चौधरी, तहसीलदार सुकेशिनी पठारे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. उपोषण मागे घेतल्यानंतर टँकर पाणीपुरवठा समाप्तीनंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात पाणीपुरवठा झालाच नाही.