शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

भाल, विठ्ठलवाडी पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 5, 2015 23:56 IST

भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील

पेण : भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात येवून अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वितरण सुरळीत करण्याबाबत जाब विचारला. मात्र ग्रामपंचायत शिष्टमंडळ कार्यालयात आले तेव्हा जबाबदार अधिकारीच गैरहजर राहिल्याने सदस्यांसह सरपंच नलिनी म्हात्रे व उपसरपंच रमाकांत म्हात्रे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.पेणच्या विठ्ठलवाडी व मोठे भाल गावाची पिण्याच्या पाण्यासाठी दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात पाऊस पडल्याने पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांनी तहान भागविली. आता पाऊस गेल्यानंतर पिण्याचे पाणी कुठून आणणार? यासाठी वढाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार करुन देखील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी डी.एन. खैरे व शाखा अभियंता मुसळे यांनी या गावांच्या पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या जलवाहिन्यांकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली आहे. काही दिवस पाणीपुरवठा न झाल्यास पुन्हा एकदा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.एप्रिलमध्ये ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी शासकीय प्रांत अधिकारी निधी चौधरी, तहसीलदार सुकेशिनी पठारे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. उपोषण मागे घेतल्यानंतर टँकर पाणीपुरवठा समाप्तीनंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात पाणीपुरवठा झालाच नाही.