शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बल घटकातील बालकांना उत्तम शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:06 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच समाजातील वंचित घटकांतील मुलांना प्रवेश नाकारून विविध शिक्षण संस्था अन्य विद्यार्थ्यांकडून बक्कळ रक्कम उकळून आर्थिकदृष्ट्या चांगल्याच गब्बर झाल्या होत्या.

अलिबाग : आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच समाजातील वंचित घटकांतील मुलांना प्रवेश नाकारून विविध शिक्षण संस्था अन्य विद्यार्थ्यांकडून बक्कळ रक्कम उकळून आर्थिकदृष्ट्या चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. शाळांच्या या मनमानी कारभाराला आता शिक्षण हक्क कायद्याची छडी लागून त्यांच्यावर अंकुश लागला आहे. याच कायद्यानुसार खासगी शाळांना आता आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के प्रवेश राखून ठेवावे लागणार आहेत. त्याबाबतची आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये पार पडली.राज्यातील आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित घटकातील बालकांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा सरकारने लागू केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कायम विनाअनुदानित व खासगी विनाअनुदानित शाळेच्या प्रवेशात २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोडत शिक्षण सभापती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित बालकांना खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव या उपक्र मामध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी ४३७ प्रवेश आणि प्राथमिक वर्गासाठी तीन हजार ६२८ प्रवेश असे एकूण चार हजार ६५ मुलांना आरक्षण कोटा ठेवण्यात आला आहे. यानुसार २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पालकांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु याचा लाभ शेवटच्या स्तरापर्यंत व्हावा यासाठी ही मुदत १० फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार चार हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्ह्यातून आलेहोते.याबाबतची सोडत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात काढण्यात आली. २५ टक्के आरक्षणामधून अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.>खासगी शाळेत मिळणार शिक्षणखासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अनेक वेळेला या घटकांच्या कोट्यातील प्रवेश इतरांना देऊन मोठी रक्कम उकळली जात होती.या पध्दतीमुळे अनेक शैक्षणिक संस्था चांगल्याच गब्बर झाल्या आहेत. तसेच त्यांची मनमानीही वाढली होती.शिक्षण हक्क कायद्यामुळे आता खासगी शाळांनी प्रवेश नाकारला तर त्यांच्या शाळेची मान्यताही रद्द होणार आहे.त्यामुळे आता खासगी शाळांमध्ये वंचित घटकातील बालकांना उत्तम शिक्षण मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.>मोबाइलवर येणार नंबर लागल्याचा संदेशपाल्याचा प्रवेश निवडलेल्या शाळेत सोडतीद्वारे होणार आहे. पालकांना आपल्या पाल्याला ज्या शाळेत पाठवायचे आहे अशा १० शाळा निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता.सोडतीनंतर ज्या पाल्याचा नंबर लागला आहे त्यांना मोबाइलद्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे. पाल्याचा नंबर शाळेत लागल्यानंतर १४ ते २४ मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रि या पूर्ण करावयाची आहे.आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित घटकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना उत्तम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणे जमत नाही.सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षण खासगी व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे या मुलांनाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.>25% आरक्षण सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये जाहीर, 10 शाळा निवडण्याचा अधिकार>पाल्याचा नंबर शाळेत लागल्यानंतर १४ ते २४ मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रि या पूर्ण करावयाची आहे.

टॅग्स :Raigadरायगड