शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

विद्यार्थ्यांना थेट खात्यातून लाभ

By admin | Updated: January 22, 2017 03:12 IST

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना लाभ देताना आधी संबंधित यंत्रणा वस्तूंची खरेदी करीत होत्या. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जायचे. ही दुकानदारी बंद करून आता लाभार्थ्याच्या

- आविष्कार देसाई,  अलिबाग

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना लाभ देताना आधी संबंधित यंत्रणा वस्तूंची खरेदी करीत होत्या. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जायचे. ही दुकानदारी बंद करून आता लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट योजनेचा लाभ दिला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे ३ लाख १४ हजार ६०० लाभार्थी आहेत. त्यानुसार सरकारकडून प्राप्त होणारे सुमारे ९ कोटी ८७ लाख रुपये बँक खात्यावर जमा होऊ शकतात. विद्यार्थ्यांचे शून्य रकमेचे बँक खाते काढून त्याला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूदही केली जाते; परंतु काही वेळा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून लाभार्थ्यांची खोटी नावे, बनावट कागदपत्रे तयार करून लाभार्थ्यांचा हिस्सा हडप करण्याचे प्रकार समोर आले आहेत. योग्य लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्याचप्रमाणे वस्तूंची खरेदी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, अशी विविध योजनेतील बरीच उदाहरणे वेळोवेळी उघड झाली आहेत. यावर उपाय म्हणून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाची रक्कम भरण्याची योजना आता पुढे आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांची सुमारे ३ लाख १४ हजार ६०० इतकी संख्या आहे. त्यामधील ९० हजार विद्यार्थ्यांच्या गणवेषसाठी सुमारे ४ कोटी रुपये लागणार आहेत. तर सुमारे २ लाख २४ हजार विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकासाठी ४ कोटी ३७ लाख रुपये आणि साडेसहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ५० लाख रुपये खर्च येतो. यामध्ये प्रामुख्याने व्हील चेअर, श्रवण यंत्र, ब्रेल कीट, चष्मा यासह अन्य साहित्यांचा समावेश आहे. यासाठी एकत्रित लागणारे सुमारे ९ कोटी ८७ लाखांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबतचे ११ जानेवारी २०१७ ते पत्र राज्य प्रकल्प संचालक नंदकुमार यांनी शिक्षण विभागांना दिले आहे.विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार असल्याने खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शून्य रकमेचे खाते काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. - शेषराव बडे, शिक्षणाधिकारी.विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याने योजनेतील भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. त्याचा फायदा हा थेट लाभार्थ्याला होणार असल्याने हे सकारात्मक पाऊल आहे. - अ‍ॅड. रत्नाकर पाटील, पालक.