आगरदांडा : मुरुड तहसीलदार प्रांगणात मंगळवारपासून सावली ग्रामपंचायत सदस्य मंदा ठाकूर यांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाला सुरु वात के ली होती. मात्र परिस्थितीचे भान राखून कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर, उपअभियंता आर.एस.माळी व मुरु ड तहसीलदार योगिता कोल्हे यांनी लेखी पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. आपण केलेल्या मागणीत पाणीपुुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, परंतु सध्या उपोषण स्थगित करावे अशी विनंती केल्याने मंदा ठाकू रयांनी उपोषण मागे घेतले आहे.या लेखी पत्रात सावली मिठागर खामदे निकृष्ट दर्जाचे पाइप बदलण्यात येऊन नवीन पाइपलाइन टाकण्यात येईल. सावली मिठागर खामदे येथे झालेल्या पाणीपुरवठ्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मिठागर गावाला भीषण पाण्याची टंचाई असून यासाठी चिंचघर धरणातून तातडीचे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, मिठागर गावाची पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी तातडीने टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे अश्वासन दिले.सन २००९-१० साली ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माण अंतर्गत सावली व खामदे येथे आणखी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख तर दुसऱ्या योजनेसाठी ५० लाख निधी मंजूर करून एकू ण१ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत.परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्षे होऊन सुध्दा गावामध्ये पाण्याचा एक थेंब सुध्दा ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही. या प्रकरणांत भ्रष्टाचार झालेला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. पंडित पाटील, मुख्यकार्यकारी अभियंता अलिबाग यांना निवेदन दिले होते. (वार्ताहर)
मंदा ठाकूर यांचे उपोषण मागे
By admin | Updated: April 19, 2017 00:39 IST