शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

जिल्ह्यातील पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:44 IST

सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत

अलिबाग : सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत. वीकेण्डला फूल टू धमाल करीत पर्यटकांनी मनमुरादपणे सुट्टीचा आनंद लुटला. सायंकाळनंतर पर्यटकांनी आपापले घर गाठायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे या मार्गावर वाहनांची गर्दी दिसत होती.शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर यासह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. पर्यटकांचा सलग तीन दिवसांचा वावर असल्याने शहरातील रस्तेही चांगलेच गजबजून गेले होते.मुंबई, पुण्यासह विशेषत: परदेशी पर्यटकांनीही या सुट्ट्यांमध्ये हजेरी लावल्याचे दिसून आले.मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने येथील हॉटेल, रेस्टारंट, बार, लॉजिंग, रिसार्ट, कॉटेजेस फूल झालेहोते. पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देत असल्याने तेथील वॉटर स्पोर्ट्स, बनाना राइड, एटीव्ही राइड, घोडे सवारी, उंटाची सफर यासह अन्य मनोरंजनाची सेवा पुरवणाºया व्यावसायिकांच्या चेहºयावर हसू पसरल्याचे दिसले.सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद मनमुरादपणे लुटल्यानंतर मंगळवार, १ मे राजी पर्यटकांनी सायंकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गजबजून गेलेले समुद्रकिनारे ओस पडत असल्याचे दिसले. अलिबाग एसटी आगार, तसेच कॅटमरॅन सेवा पुरवणाºया कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर पर्यटकांची गर्दी दिसली. काही पर्यटक हे स्वत:च्या वाहनाने आले होते. त्यांनीही दुपारनंतर अलिबागमधून माघारी जायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-पेण, पेण-पनवेल, पनवेल-मुंबई, पनवेल-ठाणे, त्याचप्रमाणे अलिबाग-पुणे या मार्गांवरही वाहनांची वर्दळ होती.