शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

जिल्ह्यातील पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:44 IST

सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत

अलिबाग : सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत. वीकेण्डला फूल टू धमाल करीत पर्यटकांनी मनमुरादपणे सुट्टीचा आनंद लुटला. सायंकाळनंतर पर्यटकांनी आपापले घर गाठायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे या मार्गावर वाहनांची गर्दी दिसत होती.शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर यासह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. पर्यटकांचा सलग तीन दिवसांचा वावर असल्याने शहरातील रस्तेही चांगलेच गजबजून गेले होते.मुंबई, पुण्यासह विशेषत: परदेशी पर्यटकांनीही या सुट्ट्यांमध्ये हजेरी लावल्याचे दिसून आले.मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने येथील हॉटेल, रेस्टारंट, बार, लॉजिंग, रिसार्ट, कॉटेजेस फूल झालेहोते. पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देत असल्याने तेथील वॉटर स्पोर्ट्स, बनाना राइड, एटीव्ही राइड, घोडे सवारी, उंटाची सफर यासह अन्य मनोरंजनाची सेवा पुरवणाºया व्यावसायिकांच्या चेहºयावर हसू पसरल्याचे दिसले.सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद मनमुरादपणे लुटल्यानंतर मंगळवार, १ मे राजी पर्यटकांनी सायंकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गजबजून गेलेले समुद्रकिनारे ओस पडत असल्याचे दिसले. अलिबाग एसटी आगार, तसेच कॅटमरॅन सेवा पुरवणाºया कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर पर्यटकांची गर्दी दिसली. काही पर्यटक हे स्वत:च्या वाहनाने आले होते. त्यांनीही दुपारनंतर अलिबागमधून माघारी जायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-पेण, पेण-पनवेल, पनवेल-मुंबई, पनवेल-ठाणे, त्याचप्रमाणे अलिबाग-पुणे या मार्गांवरही वाहनांची वर्दळ होती.