शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By निखिल म्हात्रे | Updated: March 20, 2024 14:57 IST

...त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

अलिबाग - नाक्यानाक्यावर आपल्या विकासकामांचा गाजावाजा करण्यासाठी राजकीय पक्षांना विकास कामांचे फलक लावणे हेच जाहिरातीचे प्रभावी माध्यम ठरले होते. कारण फुकटात प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि चमकोगिरी करण्यासाठी राजकीय नेते होर्डींग्ज लावत होते. मात्र अचार संहीता जाहीर होताच 72 तासानंतर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामिण भागातील सुमारे 20 हाजार 427 काढण्यात आले आहेत. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण नेहमीच करीत असतात. मात्र निवडणूकीच्या तोंडावर बॅनरबाजी करीतचमकोगिरी करणाऱ्यांना अचार संहीता जाहीर होताच आपले बँनर खाली उतरवावे लागले आहेत. अचार संहीता सुरुहोताच विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 20 हजारपेक्षा जास्त बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले, असल्याची माहीती किशन जावळे यांनी लोकमतला दिली.महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरातीही झळकत असल्या तरी यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. होर्डींग्ज बाजीत सत्ता धाऱ्यांबरोबर विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या होर्डीग्ज व बॅनर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरसकट सर्वांचेच बॅनर जिल्हा प्रशासनाने उतरविले आहेत.जिल्ह्यातील शहर भागातून साधारणत: 12000 तर ग्रामिण भागातून 8000 असे एकूण 20 हाजार 247 अनधिकृत होर्डींग्ज जिल्हाप्रशासनाने उतरविले आहेत. यामध्ये शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तर शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीयबसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासात काढून टाकण्याची कारवाई ही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या आदर्श अचार संहितेमुळे पोस्टर बरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर येत ऱस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताElectionनिवडणूक