शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By निखिल म्हात्रे | Updated: March 20, 2024 14:57 IST

...त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

अलिबाग - नाक्यानाक्यावर आपल्या विकासकामांचा गाजावाजा करण्यासाठी राजकीय पक्षांना विकास कामांचे फलक लावणे हेच जाहिरातीचे प्रभावी माध्यम ठरले होते. कारण फुकटात प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि चमकोगिरी करण्यासाठी राजकीय नेते होर्डींग्ज लावत होते. मात्र अचार संहीता जाहीर होताच 72 तासानंतर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामिण भागातील सुमारे 20 हाजार 427 काढण्यात आले आहेत. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण नेहमीच करीत असतात. मात्र निवडणूकीच्या तोंडावर बॅनरबाजी करीतचमकोगिरी करणाऱ्यांना अचार संहीता जाहीर होताच आपले बँनर खाली उतरवावे लागले आहेत. अचार संहीता सुरुहोताच विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 20 हजारपेक्षा जास्त बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले, असल्याची माहीती किशन जावळे यांनी लोकमतला दिली.महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरातीही झळकत असल्या तरी यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. होर्डींग्ज बाजीत सत्ता धाऱ्यांबरोबर विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या होर्डीग्ज व बॅनर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरसकट सर्वांचेच बॅनर जिल्हा प्रशासनाने उतरविले आहेत.जिल्ह्यातील शहर भागातून साधारणत: 12000 तर ग्रामिण भागातून 8000 असे एकूण 20 हाजार 247 अनधिकृत होर्डींग्ज जिल्हाप्रशासनाने उतरविले आहेत. यामध्ये शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तर शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीयबसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासात काढून टाकण्याची कारवाई ही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या आदर्श अचार संहितेमुळे पोस्टर बरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर येत ऱस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताElectionनिवडणूक