शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श अचारसंहितेमुळे पोस्टरबरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By निखिल म्हात्रे | Updated: March 20, 2024 14:57 IST

...त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

अलिबाग - नाक्यानाक्यावर आपल्या विकासकामांचा गाजावाजा करण्यासाठी राजकीय पक्षांना विकास कामांचे फलक लावणे हेच जाहिरातीचे प्रभावी माध्यम ठरले होते. कारण फुकटात प्रसिद्धी मिळवणाऱ्या आणि चमकोगिरी करण्यासाठी राजकीय नेते होर्डींग्ज लावत होते. मात्र अचार संहीता जाहीर होताच 72 तासानंतर जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामिण भागातील सुमारे 20 हाजार 427 काढण्यात आले आहेत. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकाकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण नेहमीच करीत असतात. मात्र निवडणूकीच्या तोंडावर बॅनरबाजी करीतचमकोगिरी करणाऱ्यांना अचार संहीता जाहीर होताच आपले बँनर खाली उतरवावे लागले आहेत. अचार संहीता सुरुहोताच विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 20 हजारपेक्षा जास्त बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले, असल्याची माहीती किशन जावळे यांनी लोकमतला दिली.महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक आणि व्यावसायिक जाहिरातीही झळकत असल्या तरी यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. होर्डींग्ज बाजीत सत्ता धाऱ्यांबरोबर विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या होर्डीग्ज व बॅनर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरसकट सर्वांचेच बॅनर जिल्हा प्रशासनाने उतरविले आहेत.जिल्ह्यातील शहर भागातून साधारणत: 12000 तर ग्रामिण भागातून 8000 असे एकूण 20 हाजार 247 अनधिकृत होर्डींग्ज जिल्हाप्रशासनाने उतरविले आहेत. यामध्ये शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण यामध्ये शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होर्डिंग/बॅनर/झेंडे इत्यादी निवडणूका जाहिर झाल्यानंतर 72 तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात आली आहे. तर शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीयबसेस, इलेक्ट्रीक/टेलिफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून 72 तासात काढून टाकण्याची कारवाई ही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या आदर्श अचार संहितेमुळे पोस्टर बरोबर पोस्टरबाज देखील जमिनीवर येत ऱस्त्यांनी घेतला मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताElectionनिवडणूक