शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 02:08 IST

सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे.

अभय पाटीलबोर्ली पंचतन : सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. त्यामुळे किनाºयावरील सुरू, केतकी तसेच अन्य वनसंपदा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दिवेआगर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये केव्हा धडकेल याचा आता नेम राहिलेला नाही. दिवेआगर समुद्रकिनारी मागील काही वर्षांपासून संरक्षक बंधारा बांधण्याच्या आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या. प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक निधी केव्हा येणार व संरक्षक बंधारा केव्हा होणार याच प्रतीक्षेत सागरप्रेमी व दिवेआगर ग्रामस्थ आहेत.दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पश्चिमेला असणाºया अरबी समुद्रामुळे व गावाला नारळ, सुपारीच्या लाभलेल्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण बागा यामुळे या किनाºयावर पर्यटक वीकेण्ड व सुट्टीची मौजमजा करण्यासाठी नेहमीच येत असतात. मात्र, समुद्रामध्ये होत असलेले भराव, सततची येणारी वादळे यामुळे भयंकर उसळणाºया लाटा यामुळे सुरूच्या झाडांची वनराई, केतकीच्या झाडांची वने, त्याचप्रमाणे इतरही औषधी व महत्त्वाची झाडे नष्ट होत आहेत. यासाठी समुद्रकिनारी अद्यापही कोणत्याही प्रकारे संरक्षक बंधारा नसल्याने ही धूप दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. दिवेआगरचा समुद्रकिनारा सुमारे तीन कि.मी. लांबीचा आहे, त्या ठिकाणी मोठा निधी खर्ची घालून उत्तम बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री यांनी संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटींच्या निधीची घोषणा केली; परंतु त्या घोषणेचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिज्ञ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही दिवेआगर येथील याच संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटी रुपये मिळून देण्याची घोषणा केली आहे. दिवेआगर समर्थ पाखाडी बाजूचा भाग हा समुद्रकिनाºयाला लागून असल्याने समुद्राची अशीच धूप होत राहिल्यास समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्यास वेळ लागणार नाही.त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने किनाºयावर बांधलेले वॉच टॉवरही लाटांच्या माºयाने जमीनदोस्त झाला आहे. लोखंडी असलेला हा वॉच टॉवर आवश्यक असून, लोखंडी ऐवजी मजबूत काँक्रीटीकरणाचा बांधण्याची मागणी होत आहे.>पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा तर केंद्राच्या सागरी योजनेतून आणखी भरघोस निधी आणण्याचे प्रयत्न रायगडचे खासदार तसेच आमदार यांचे आहेत.- उदय बापट, सरपंच, दिवेआगर