शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 02:08 IST

सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे.

अभय पाटीलबोर्ली पंचतन : सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. त्यामुळे किनाºयावरील सुरू, केतकी तसेच अन्य वनसंपदा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दिवेआगर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये केव्हा धडकेल याचा आता नेम राहिलेला नाही. दिवेआगर समुद्रकिनारी मागील काही वर्षांपासून संरक्षक बंधारा बांधण्याच्या आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या. प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक निधी केव्हा येणार व संरक्षक बंधारा केव्हा होणार याच प्रतीक्षेत सागरप्रेमी व दिवेआगर ग्रामस्थ आहेत.दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पश्चिमेला असणाºया अरबी समुद्रामुळे व गावाला नारळ, सुपारीच्या लाभलेल्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण बागा यामुळे या किनाºयावर पर्यटक वीकेण्ड व सुट्टीची मौजमजा करण्यासाठी नेहमीच येत असतात. मात्र, समुद्रामध्ये होत असलेले भराव, सततची येणारी वादळे यामुळे भयंकर उसळणाºया लाटा यामुळे सुरूच्या झाडांची वनराई, केतकीच्या झाडांची वने, त्याचप्रमाणे इतरही औषधी व महत्त्वाची झाडे नष्ट होत आहेत. यासाठी समुद्रकिनारी अद्यापही कोणत्याही प्रकारे संरक्षक बंधारा नसल्याने ही धूप दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. दिवेआगरचा समुद्रकिनारा सुमारे तीन कि.मी. लांबीचा आहे, त्या ठिकाणी मोठा निधी खर्ची घालून उत्तम बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री यांनी संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटींच्या निधीची घोषणा केली; परंतु त्या घोषणेचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिज्ञ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही दिवेआगर येथील याच संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटी रुपये मिळून देण्याची घोषणा केली आहे. दिवेआगर समर्थ पाखाडी बाजूचा भाग हा समुद्रकिनाºयाला लागून असल्याने समुद्राची अशीच धूप होत राहिल्यास समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्यास वेळ लागणार नाही.त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने किनाºयावर बांधलेले वॉच टॉवरही लाटांच्या माºयाने जमीनदोस्त झाला आहे. लोखंडी असलेला हा वॉच टॉवर आवश्यक असून, लोखंडी ऐवजी मजबूत काँक्रीटीकरणाचा बांधण्याची मागणी होत आहे.>पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा तर केंद्राच्या सागरी योजनेतून आणखी भरघोस निधी आणण्याचे प्रयत्न रायगडचे खासदार तसेच आमदार यांचे आहेत.- उदय बापट, सरपंच, दिवेआगर