शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वाकण-खोपोली महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:27 IST

वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले

पाली : वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ते काम बेग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करीत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अतिपर्जन्यवृष्टीमुळे अर्धवट राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तेथून अवजड वाहतूक करणे धोकादायक आहे. तसेच पाली येथील अंबा नदीवरील पूल हा जुना व जीर्ण झाला असल्याने यावरून अति अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो व दुर्घटना होऊ शकते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी वाकण-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात येत असल्याची अधिसूचना सोमवार १५ जुलै रोजी पाली-सुधागड तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे काढली आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाने, वाकण-पाली-खोपोली हा रस्ता नवीन राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ मध्ये घोषित केला आहे. हा रस्ता २३ जून, २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित झाला असून, या रस्त्याचे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर केंद्रीय मंत्रालयाच्या निदेशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थिती हे काम प्रगतीत असून काही ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते दिलेले आहेत. परंतु सध्याच्या अति पर्जन्यवृष्टीमुळे हे वळण रस्ते काही ठिकाणी क्षतीग्रस्त झाले आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे अंबा नदीवरील पाली येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहते हा पूल जुना व जीर्ण असल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून, पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता (रा.म) म.रा.र.वि यांनी लेखी पत्राव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे केली होती. त्या अनुषंगाने सद्यस्थिती जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तसेच पाली येथील अंबा नदी पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करून, ही वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे सबंधित विभागांना दिल्या आहेत.