शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

दशावतारी कलेसाठी बालदशावतारांची धडपड

By admin | Updated: December 31, 2016 21:57 IST

आशेचा किरण : धार्मिक संस्कृतीचे शिक्षण, प्रबोधन करण्याचे काम

प्रथमेश गुरव --वेंगुर्ले --कोकणातील सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाच्या मानल्या गेलेल्या दशावतार कलेत आता पौढच नाही तर युवकारांबरोबर लहान मुलेही हिरीरीने भाग घेऊन ही कला उत्तमरित्या सादर करीत आहेत. भविष्यात दशावतार कला जीवंत ठेवण्यासाठी आत्ताची बाल दशावतार मंडळे महत्वाची कामगिरी बजावणार असल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे. दशावतार हा नाट्यप्रकार 700 ते 800 वषार्पूर्वी पासूनचा कोकणात रुढ झालेला आहे. त्या काळात मनोरंजनाचे साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रामुख्याने समाज जागृती, समाजशिक्षण, धार्मिक संस्कृतीचे शिक्षण व प्रबोधन करण्याचे काम होत असे. पुराणातील कथांच्याद्वारे दशावतार नाटज्निर्मिती करुन या लोककलेला अधिष्ठान प्राप्त करुन दिले. सत्य-असत्य याचा सुरेख मेळ घालून शेवटी सत्याचा विजय होते हे सूत्र प्रकषार्ने मनावर ठसविण्याचे काम या नाटज्प्रकारातून केले जात आहे. पूर्वी अशा नाटकांनी काम करणारे कलाकारही जवळ जवळ 30 वयोमानाच्या पुढचे दिसायचे. संगीत साथीलाही त्याच वयोमानाचे पुरुष. आणि दशावतार नाटकेही गावच्या जत्रोत्सवांपुरती मर्यादित असायची. पण त्यानंतर हळुहळू या दशावतारी नाटकांना चांंगले दिवस आले. जत्रोत्सवांबरोबरच गावातील लहान - मोठज कार्यक्रमांना दशावतार नाटके ठेवली जाऊ लागली आणि ही नाटके सायंकाळी 7 ची असल्याने जागरण न जमणा-या रसिकांनी याचा आस्वाद घेता येऊ लागला. त्यामुळे या कलेला भरपूर प्रतिसाद मिळाला. लहान मुलेही या नाटकांना जाऊ लागली. परिणामी त्यांच्यातही या नाटकाची आवड निर्माण झाली.अलिकडे शालेय कार्यक्रमात अशी नाटके बसवून त्यात लहान मुलांना सहभागी करुन घेतले जात आहे. अणसूर येथील एका शाळेने बसविलेले भोमासूर वध हे नाटक तर अव्वल ठरले. परंतु काही शाळांमधील मुले ही कला एका विशिष्टच कार्यक्रमापुरती सादर करीत असल्याने त्या मुलांमधील कला ही त्याच भागापुरती मर्यादित राहिली. लहान मुलांची ही पंचक्रोशीतील लोकांना समजावी यासाठी वेंगुर्ले शहरातील तसेच ग्रामीण भागातील अशा मुलांना एकत्र करुन श्री रामेभर बाल दशावतार नाटज् कंपनीही काढण्यात आली. गेली तीन वर्षे या कंपनीची वेंगुर्ले, दाभोली, नाणोशी, तिरोडा, गवंडीवाडा अशा ठिकाणी नाटज्प्रयोग सादर झाले आहेत. पंचक्रोशीत विविध ठिकाणी नाटक केल्याने मुलांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले. अशाप्रकारे ठिकठिकाणी स्थानिक लोकांनी, मुलांच्या पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांचा सहभाग असलेली नाटज् मंडळे निर्माण केली. दरम्यान, ही लोककला वृद्धींगत होण्यासाठी तसेच उत्कृष्ट कलाकार होण्याच्यादृष्टीने मुलांमध्ये चांगला बदल व्हावा यासाठी खानोली-सुरंगपाणी येथे 15 ते 25 वयोगटातील मुलांची दशावतारी नाटज् स्पर्धा घेण्यात आली. याला उर्त्स्फूत प्रतिसादही लाभला. यात 15 वयोगटापेक्षाही कमी वयाच्या मुलांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. एवढज लहान वयात पुराणातील कथा सर्वांसमोर सादर करण्याची कला ही मुले लिलया पार पाडीत आहेत. अशाप्रकारच्या स्पर्धा दरवर्षी झाल्यास या मुलांना एक चांगले व्यासपिठ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात दशावतार कला लोप न पावता ती अधिकाधिक वाढत जाणार आहे यात शंकाच नाही.