शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

By राजेश भोस्तेकर | Updated: November 8, 2022 15:22 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची धक्कादायक घटना घडली.

अलिबाग : अलिबाग मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची घटना सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्यासह डॉक्टरांना जाब विचारून चांगलेच फैलावर घेतले. तसेच दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या सात महिन्यात जिल्हा रुग्णालयात ४९ बालके प्रसूती दरम्यान दगावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे त्रास देत असल्याची तक्रार अनेकांनी यावेळी केली असून खुद्द अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनीही याला दुजोरा दिला आहे. दोन्ही अधिकारी यांची यावेळी शाब्दिक चकमक ही पाहायला मिळाली. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सक यांच्यातच एकोपा नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सर्वसामान्य नागरिक हा खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतो. खाजगी रुग्णालयात प्रसूती खर्च हा परवडणारा नसल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गरोदर महिला दाखल होतात. मात्र त्यांना उपचार देताना रुग्णालय प्रशासन तर्फे दिरंगाई होण्याच्या घटनाही घडत असतात. अलिबाग तालुक्यातील वायशेत आणि आवास येथील दोन महिला यांची स्त्रीरोग तज्ञ्ज डॉ. अनिल फुटाणे यांच्याकडे प्रसूती बाबत उपचार सुरू होते. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दोघींनाही प्रसूती कळा सुरू झाल्याने फुटाणे यांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. 

जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलाना वेळेत उपचार न मिळाल्याने त्याची बाळे दगावली. या घटनेची माहिती मिळताच मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. प्रसूती कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ प्रमोद गवई, डॉ अनिल फुटाणे तसेच त्यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना दळवी यांनी विचारणा केली. यावेळी मानसी दळवी, राजा केणी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दोषीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन डॉ सुहास माने यांनी दिले. 

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कोणतेही लक्ष नसल्याचा आरोप मानसी दळवी यांनी केला आहे. खाजगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात येत असतात. मात्र याठिकाणीही रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. हलगर्जी पणामुळे कोणाचा जीव जात असेल तर कोणालाही सोडणार नाही असा इशाराही मानसी दळवी यांनी दिला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागhospitalहॉस्पिटल