शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:11 IST

नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने

कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या समितीने कोल्हारे आणि धामोते भागात पाहणी केली आहे. त्यानुसार नैसर्गिक नाले अडविणाºया बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायती यांचे मिळून नेरळ विकास प्राधिकरण बनविले आहे. पुणे येथील नगररचना विभाग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी प्राधिकरण बनविले होते. धामोते आणि कोल्हारे हद्दीत प्राधिकरणाने बांधकाम व्यावसायिकांना इमारती, टॉवर बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नालेच बंद केल्याने पाण्याचा निचराच होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाऊन राज्यमार्ग दर्जाचा रस्ता बंद झाला होता. एक तास पाऊस पडला तरी रस्त्यावरून पाणी जात असल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. स्थानिक सदस्या वंदना पेरणे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर, धामोते भागातील बिल्डरला कोल्हारे ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. परंतु ग्रामपंचायतीचे बिल्डर ऐकत नसल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या भागातून निवडून गेलेले सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीची बाजू ठामपणे मांडल्याने जिल्हा परिषदेच्या एका समितीने आज नेरळ परिसराची पाहणी केली. डामसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोपकर, कार्यकारी अभियंता बारदेशकर, नगरविकास विभागाचे तायडे यांच्यासह कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, प्राधिकरणचे उपअभियंता सदानंद शिर्के, कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र विरले तसेच सदस्य उपस्थित होते. समितीने प्राधिकरण हद्दीत सुरू असलेली बांधकामे आणि त्यासाठी करण्यात आलेला भराव, साठलेल्या पाण्याची पाहणी केली.समिती आपला अहवाल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असून ते सर्वसाधारण समितीपुढे ठेवणार आहेत. गेली चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी मातीचा भराव केला आहे. त्यामुळे समितीकडून अहवाल सादर झाल्यावर कठोर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहणी दौºयानंतर आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल असे समितीमधील एका अधिकाºयाकडून सांगण्यात आले.