शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:11 IST

नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने

कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या समितीने कोल्हारे आणि धामोते भागात पाहणी केली आहे. त्यानुसार नैसर्गिक नाले अडविणाºया बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायती यांचे मिळून नेरळ विकास प्राधिकरण बनविले आहे. पुणे येथील नगररचना विभाग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी प्राधिकरण बनविले होते. धामोते आणि कोल्हारे हद्दीत प्राधिकरणाने बांधकाम व्यावसायिकांना इमारती, टॉवर बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नालेच बंद केल्याने पाण्याचा निचराच होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाऊन राज्यमार्ग दर्जाचा रस्ता बंद झाला होता. एक तास पाऊस पडला तरी रस्त्यावरून पाणी जात असल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. स्थानिक सदस्या वंदना पेरणे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर, धामोते भागातील बिल्डरला कोल्हारे ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. परंतु ग्रामपंचायतीचे बिल्डर ऐकत नसल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या भागातून निवडून गेलेले सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीची बाजू ठामपणे मांडल्याने जिल्हा परिषदेच्या एका समितीने आज नेरळ परिसराची पाहणी केली. डामसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोपकर, कार्यकारी अभियंता बारदेशकर, नगरविकास विभागाचे तायडे यांच्यासह कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, प्राधिकरणचे उपअभियंता सदानंद शिर्के, कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र विरले तसेच सदस्य उपस्थित होते. समितीने प्राधिकरण हद्दीत सुरू असलेली बांधकामे आणि त्यासाठी करण्यात आलेला भराव, साठलेल्या पाण्याची पाहणी केली.समिती आपला अहवाल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असून ते सर्वसाधारण समितीपुढे ठेवणार आहेत. गेली चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी मातीचा भराव केला आहे. त्यामुळे समितीकडून अहवाल सादर झाल्यावर कठोर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहणी दौºयानंतर आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल असे समितीमधील एका अधिकाºयाकडून सांगण्यात आले.