शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बांधकाम व्यावसायिकांनी बुजवले नैसर्गिक नाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:11 IST

नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने

कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसून रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे सर्व प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या समितीने कोल्हारे आणि धामोते भागात पाहणी केली आहे. त्यानुसार नैसर्गिक नाले अडविणाºया बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायती यांचे मिळून नेरळ विकास प्राधिकरण बनविले आहे. पुणे येथील नगररचना विभाग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी प्राधिकरण बनविले होते. धामोते आणि कोल्हारे हद्दीत प्राधिकरणाने बांधकाम व्यावसायिकांना इमारती, टॉवर बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नालेच बंद केल्याने पाण्याचा निचराच होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाऊन राज्यमार्ग दर्जाचा रस्ता बंद झाला होता. एक तास पाऊस पडला तरी रस्त्यावरून पाणी जात असल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. स्थानिक सदस्या वंदना पेरणे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर, धामोते भागातील बिल्डरला कोल्हारे ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. परंतु ग्रामपंचायतीचे बिल्डर ऐकत नसल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या भागातून निवडून गेलेले सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीची बाजू ठामपणे मांडल्याने जिल्हा परिषदेच्या एका समितीने आज नेरळ परिसराची पाहणी केली. डामसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोपकर, कार्यकारी अभियंता बारदेशकर, नगरविकास विभागाचे तायडे यांच्यासह कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, प्राधिकरणचे उपअभियंता सदानंद शिर्के, कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र विरले तसेच सदस्य उपस्थित होते. समितीने प्राधिकरण हद्दीत सुरू असलेली बांधकामे आणि त्यासाठी करण्यात आलेला भराव, साठलेल्या पाण्याची पाहणी केली.समिती आपला अहवाल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असून ते सर्वसाधारण समितीपुढे ठेवणार आहेत. गेली चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी मातीचा भराव केला आहे. त्यामुळे समितीकडून अहवाल सादर झाल्यावर कठोर कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहणी दौºयानंतर आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल असे समितीमधील एका अधिकाºयाकडून सांगण्यात आले.