शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रातून मतदारांमध्ये जनजागृती; पुढील काही दिवस सुरू राहणार मार्गदर्शन

By निखिल म्हात्रे | Updated: March 6, 2024 21:26 IST

लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ती सुरू राहणार आहे.

अलिबाग तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 800 हून अधिक मतदारांनी या केंद्राला भेट दिली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापत असले तरी दुसरीकडे निवडणूक विभाग तयारीला लागले आहे.

लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्ही पॅट मशीनदेखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले. मतदान करण्यापासून, मतदान केल्यावर कोणाला मतदान केल्याची माहिती मतदारांना कशी मिळणार आहे. याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सांगण्याचे काम तालुका स्तरावर सुरु केले आहे. अलिबाग येथील तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक केंद्र सुरु केले आहे.

अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. रामराजचे मंडळ अधिकारी आर.एम. मांढरे, रेवदंड्यातील तलाठी संजय शिंगे, रामराजचे तलाठी पी.एस. थोरात, थळचे तलाठी मयूर नाईक यांची याठिकाणी निवड केली आहे. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मतदार या प्रात्यक्षिक केंद्राला भेट देत आहेत. यातून मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईव्हएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे अभिप्राय घेऊन त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यात येत आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग