शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी 84 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:06 IST

७८ ग्रामपंचायतींसाठी ६१४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. ३०२ मतदान केंद्रांवर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. ६१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे. १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार असल्याने उमेदवारांची धाकधूक पुढील दाेन दिवस कायम राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कोरोना नियमांचे पालन करून मतदारांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत हाेता. सुरुवातीला सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर गर्दी वाढत हाेती. दुपारी पुन्हा मतदारांनी ब्रेक घेतला. नंतर पुन्हा मतदानाला प्रारंभ झाला. पेझारी ग्रामपंचायतीमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने परस्पर दाेघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाेलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविला. मतदान यंत्रातील बिघाडही दूर करण्यात आला, तसेच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्येही बिघाड झाले हाेते. तेथे तातडीने नवीन मतदान यंत्रे देण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले. सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत १४.८० टक्के मतदान झाले हाेते. साडेसात ते साडेअकरा ३५.१२ टक्के, साडेसात ते दीड वाजेपर्यंत ५४.३५ टक्के मतदान झाले, तर साडेसात ते साडेतीन या कालावधीत ६८.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६१२ जागांसाठी १ हजार ५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराने मास्क लावले नसेल तर त्याला कक्षात सोडले जात नव्हते. प्रत्येक मतदाराचे शारीरिक तापमान, ऑक्सिजनची क्षमता तपासली जात होती. मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. पेणमध्ये सात ग्रामपंचायतीसाठी ६७ ११ हजार  ११,८३८ मतदारांनी मतदान केले.  दुपारी ४ वाजेपर्यत ७७ टक्के मतदान  झाले.

कर्जतमध्ये ८७ टक्के मतदानn कर्जत : तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. तालुक्यात १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ७१ जागांसाठी १६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  n बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरळ सामना अपेक्षित आहे. शुक्रवारी सकाळी बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून, १८ तारखेला मतमोजणी होणार आहे.n तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशिर, साळोख तर्फ वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, आणि दामत या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली.n  कोल्हारे ग्रामपंचायतींमध्ये रुक्मिणी हिलाल या ९२ वर्षांच्या आजींनी मतदान केले. मतदारांनी मास्क लावले होते परंतु सोशल डिस्टसिंगचे तीन - तेरा उडाले होते.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक