शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
5
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
6
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
7
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
8
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
9
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
10
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
11
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
12
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
13
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
14
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
15
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
16
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
17
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
18
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
19
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
20
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!

संपत्ती घोषणेबाबत अधिकारी ‘अपारदर्शक’

By admin | Updated: December 27, 2016 02:40 IST

प्रशासनाच्या पातळीवरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापली मालमत्ता जाहीर करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. परंतु जिल्हा

- आविष्कार देसाई,  अलिबागप्रशासनाच्या पातळीवरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापली मालमत्ता जाहीर करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. परंतु जिल्हा प्रशासनातील ८२ टक्के क्लासवन अधिकारी यांनी मालमत्ता व दायित्व याचे विवरण पत्र देण्यात चालढकलपणा केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनामध्ये तर आलबेलच आहे. त्यांच्याकडील अधिकारी आणि कर्मचारी यांचा रेकॉर्ड अद्यापही अपडेट नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पारदर्शकता राहणार कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्ग दोन, तीन संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मात्र याला चांगल्या संख्येने प्रतिसाद दिला आहे.देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावत आहे. जगभरात भ्रष्टाचारामध्ये भारताचा ७८ वा क्रमांक लागतो. देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकार विविध पावले टाकत आहे. राजकीय पातळीवरील लाखो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार वेळोवेळी चव्हाट्यावर आले आहेत. निवडणूक लढविताना सर्वच राजकीय तसेच बिगर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मालमत्तेचे विवरण पत्र देणे बंधनकारक केले आहे. ते सादर केले नाही तर त्यांना निवडणूक लढवता येत नाही. यासाठी त्यांच्याकडून ते तातडीने सादर केले जाते. भविष्यात त्यांच्या मालमत्तेमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पुढील निवडणुकीच्या वेळी कळते. प्रशासनाच्या पातळीवरही मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी सेवेत सामील झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये मालमत्तेचे विवरण पत्र सादर करावे लागते. यूपीएसस, एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या परीक्षा उतीर्ण होऊन सरकारी सेवेते रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने मालमत्ता विवरण पत्र देणे गरजेचे आहे. कारण याच क्लासवन अधिकाऱ्यांनी समाज सुधारणेचा अभ्यास करून आदर्श समाज निर्मितीचे स्वप्न पाहिलेले असते. त्यांच्याकडूनच मालमत्ता घोषित करण्याचे राहून गेले, तर त्यांच्याकडून आदर्श समाज निर्मितीची अपेक्षा कशी करणार, असा प्रश्न उभा राहतो.रायगड जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांची ४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३३ पदे भरलेली आहेत. ३३ पैकी फक्त सहा म्हणजेच १८ टक्के क्सासवन अधिकाऱ्यांनी मालमत्ता विवरण पत्र सादर केले आहे. उर्वरित ८२ टक्के म्हणजे २७ क्लासवन अधिकारी यांनी ते सादरच केलेले नाही. मात्र त्यांच्या खालच्या क्रमवारीत येणाऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मालमत्तेबाबत विवरण पत्र सादर केलेले आहे.जिल्हा परिषद प्रशासनामध्ये सेस फंडासह केंद्र आणि राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे त्या आस्थापनेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अतिशय दक्षपणे आपापली मालमत्तेसंदर्भातील विवरण पत्रे सादर करणे अतिशय गरजेचे आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये तर अद्यापही मालमत्ता विवरण पत्र सादर केलेले अथवा न केलेले याची यादी अपडेट करण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.- एखाद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याच्याबाबतीमध्ये भ्रष्टाचाराची तक्रार दाखल होते तेव्हा संबंधित तपास यंत्रणेसह लाचलुचपत विभाग त्या तक्रार असलेल्या अधिकारी अथवा कर्मचारी यांचे लखोटाबंद मालमत्ता व दायित्वाचे विवरण पत्र उघडतो. संबंधित प्राधिकारी त्या विवरण पत्रांची केव्हाही छाननी करू शकतो.- अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मालमत्ता व दायित्व याचे विवरण पत्र सादर केले नाही, तर त्यांची पदोन्नती रोखण्यात येते. त्यामुळे विवरण पत्रे भरली जातात. गेल्या तीन वर्षापासून सरकारने याबाबत कडक भूमिका घेतल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मालमत्ता व दायित्व विवरण पत्र सादर केलेलेसंवर्ग कार्यरत विवरण विवरण पत्र टक्केवारीपत्र दिलेले न दिलेले उपजिल्हाधिकारी/तहसीलदार३३ ६ २७ १८नायब तहसीलदार ७९ ३९ ४०४९अव्वल कारकून १७६ १५६ २०८९मंडळ अधिकारी ५७ ४८ ९८४लिपिक३१० २९८१२९३तलाठी ३६८ ३५४ १४ ९६वाहन चालक २८१९९६८लघु टंकलेखक२११५०एकूण १०५३ ९२११३२८७