शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

स्थलांतरितांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - भरत गोगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 02:05 IST

महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे. कोथेरी जंगमवाडीमधील तीन कुटुंब रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. माझेरी पारमाची या ठिकाणी जमिनीला व घराला तडे गेले आहेत. या सर्व ठिकाणच्या बाधित कुटुंबीयांची आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता राज्य सरकारकडून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे गोगावले यांनी या वेळी स्पष्ट केले.मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन तसेच घरांना तडे जाऊन सुमारे १०० कुटुंब बाधित झाली आहेत. त्यांना शासनाकडून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी या वेळी दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी जमिनीला, रस्त्यांना तडे गेले आहेत, त्या ठिकाणांची पाहणी भूगर्भाच्या पथकांमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. नागरिकांनी भयभीत न होता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या वेळी गोगावले यांनी केले.महाड तालुक्यातील रस्ते व घाट यांचे नुकसान झाल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. शेतीचे पंचनामे सुरू असून नागरिकांना मदतीसाठी असलेल्या जाचक अटी-नियम बदलण्यात यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी महाड एमआयडीसीमध्ये नुकसानी झालेल्या कारखान्यांचीही भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली आहे.बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदतबिरवाडी : महापुरांमध्ये महाड तालुक्यातील लाडवली येथील बंधू चव्हाण यांच्या तीन म्हशी पुरामुळे मृत्युमुखी पडल्या. त्यांना आमदार भरत गोगावले यांनी व्यक्तिगत १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, तसेच शिरसावणे येथील संतोष साळेकर यांचे घरही पावसामुळे पडले, त्यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड