शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

स्थलांतरितांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - भरत गोगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 02:05 IST

महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे. कोथेरी जंगमवाडीमधील तीन कुटुंब रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. माझेरी पारमाची या ठिकाणी जमिनीला व घराला तडे गेले आहेत. या सर्व ठिकाणच्या बाधित कुटुंबीयांची आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता राज्य सरकारकडून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे गोगावले यांनी या वेळी स्पष्ट केले.मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन तसेच घरांना तडे जाऊन सुमारे १०० कुटुंब बाधित झाली आहेत. त्यांना शासनाकडून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी या वेळी दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी जमिनीला, रस्त्यांना तडे गेले आहेत, त्या ठिकाणांची पाहणी भूगर्भाच्या पथकांमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. नागरिकांनी भयभीत न होता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या वेळी गोगावले यांनी केले.महाड तालुक्यातील रस्ते व घाट यांचे नुकसान झाल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. शेतीचे पंचनामे सुरू असून नागरिकांना मदतीसाठी असलेल्या जाचक अटी-नियम बदलण्यात यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी महाड एमआयडीसीमध्ये नुकसानी झालेल्या कारखान्यांचीही भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली आहे.बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदतबिरवाडी : महापुरांमध्ये महाड तालुक्यातील लाडवली येथील बंधू चव्हाण यांच्या तीन म्हशी पुरामुळे मृत्युमुखी पडल्या. त्यांना आमदार भरत गोगावले यांनी व्यक्तिगत १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, तसेच शिरसावणे येथील संतोष साळेकर यांचे घरही पावसामुळे पडले, त्यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड