शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 23:38 IST

शेतीच्या कामांना वेग : उकाड्यातून सुटका; दहा-बारा दिवसांत भात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता

अलिबाग : मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उकाडा वाढल्यानंतर सोमवारी पहाटे पहिला पाऊस बरसला. उकाड्याने अलिबागसह रायगडकर हैराण झाले होते. सोमवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा खूश झाला आहे. साधारणत: १० वर्षांनी जूनच्या १ तारखेलाच पावसाने हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.पावसाचे आगमन होताच शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. यंदाच्या कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले होते. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण व्हायचे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. अखेर सोमवारी पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला असून येत्या १० ते १२ दिवसांत भाताच्या पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जून महिन्यात पेरणीकामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या हाताला धान्योत्पादन येऊ शकते. शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून ट्रॅक्टरने व बैलाच्या साहाय्याने नांगरणी, कुळवण करून शेतामधील तणाने व्यापलेल्या जमिनीची वेचणी करण्यात तो मग्न आहे.

मुरूड शहरामध्ये पावसाचा शिडकावाच्आगरदांडा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते.च्सोमवारी दुपारी पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुरूडकर सुखावले.च्भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. ३ जून आणि ४ जून रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रेड आणि आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसाच्या तुरळक सरीच्रेवदंडा : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असतानाच सोमवारी पहाटे पावसाचा शिडकावा सुरू झाला आणि मान्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यामुळे आंबा विक्री करण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय झाली.च्बाजारात प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थ हैराण झाले. बळीराजा मशागतीची कामे वेगाने करताना दिसत आहे.

विजांचा कडकडाटउरण : कोरोना आणि लॉकडाउनमध्येच उकाड्याने घामाघूम झालेल्या उरणवासीयांना सोमवारी सकाळीच विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला आहे. विजेच्या कडकडाटाने मध्यरात्रीपासून उरणकरांची झोप उडाली होती. मात्र पावसाच्या शिडकाव्याने काही प्रमाणात का होईना गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना व उकाड्याने हैराण झालेल्या उरणवासीयांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. तर या हलक्या सरींनी बळीराजाला शेतीच्या कामांसाठी जागा होण्याचा इशाराही दिला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते.चक्रीवादळाचा तडाखा

माणगाव : मान्सूनपूर्व पावसासोबतच वेगाने घोंगावलेल्या चक्रीवादळामुळे निजामपूर शहर आणि ग्रामीण भागातही घरांच्या छपराची पडझड होऊन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. निजामपूर शहरातील बस स्थानक, समर्थनगर या ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटून जमिनीवर पडल्या. महावितरण कर्मचाºयांनी दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेतल्याने जीवितहानी टळली.२लॉकडाउनमधून नुकत्याच सावरलेल्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे पत्रे, लोखंडी पाइप उडाल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या इमारतीचे छप्पर तुटून पार्किंगमधील चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे.३ग्रामीण भागातील उधळेकोंड, घोडशेतवाडी, चाच, केळगण या गावांमध्ये सिमेंट पत्रे तुटून घरांच्या भिंतींना भेगा पडल्या. अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळामुळे निजामपूर बाजारपेठेसह खेडोपाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या महामारीत खंबीरपणे लढत असलेला सर्वसामान्य नागरिक या नैसर्गिक आपत्तीपुढे मात्र हतबल झाला असून, शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.